शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

कळव्यात आव्हाड आणि नाईक समर्थक भिडले

By admin | Updated: February 5, 2017 03:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवाटपात हस्तक्षेप करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याच्या आरोप करून कळवा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवाटपात हस्तक्षेप करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याच्या आरोप करून कळवा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाईक यांच्यामुळेच निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. केवळ एकाच प्रभागात दोघांना एबी फॉर्म दिल्यावरून हा गोंधळ उडाला असला, तरी या ठिकाणी आव्हाड विरुद्ध नाईक असाच काहीसा संघर्ष दिसला.राष्ट्रवादीने प्रभाग क्र मांक २४ क मधून जितेंद्र पाटील आणि अक्षय ठाकूर, तर प्रभाग क्र मांक २५ क मधून रीटा यादाव आणि वर्षा मोरे यांना अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठाण्याचे संपर्क नेते गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अंतर्गत कलहामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्यावरून बराच संघर्ष झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाईक गटाच्या अक्षय ठाकूर, तर आव्हाड गटाच्या वर्षा मोरे यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे जाहीर केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली यादी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. पक्षातर्फे अनेकांना एबी फॉर्म दिले असले, तरी अनेक ठिकाणी नाईक यांच्यामुळे चुकीचे उमेदवार लादण्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. कळव्यातील काही प्रभागांमध्ये त्यांनी दबावतंत्र वापरून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. या कार्यकर्त्यांनी शनिवारी कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर गणेश नाईक यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आव्हाड यांच्या गटाने जितेंद्र पाटील आणि वर्षा मोरे यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींकडून मंजूर करून घेतली असताना त्याच जागांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अक्षय ठाकूर आणि रीटा यादव यांनासुद्धा पक्षाचा एबी फॉर्म दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, यावरून कळव्यात प्रचंड वादंग झाला. मोरे आणि पाटील यांनी अर्ज सादर केल्यानंतर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या अधिकृत पत्रासह पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले होते. तर, अन्य दोघांनी अर्जासोबतच ते प्रदेशाध्यक्षांचे पत्र जोडले होते. कोणता उमेदवार अधिकृत आहे, हे ठरवताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कस लागला. अखेर रीटा यादव आणि जितेंद्र पाटील यांचे अर्ज बाद करून ठाकूर आणि मोरे हे पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर लढू शकतील, असा निर्णय त्यांनी दिला. एकूणच आता उमेदवारीचा मुद्दा जरी संपुष्टात आला असला तरीदेखील राष्ट्रवादीमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. (प्रतिनिधी)