शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वायत्त महाविद्यालयांनी नवे बदल स्वीकारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

ठाणे : स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिप्रेक्ष्यात नवे बदल स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे मत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे ...

ठाणे : स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिप्रेक्ष्यात नवे बदल स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे मत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे प्रमुख सल्लागार व माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले. स्वायत्त महाविद्यालयांनी सृजनात्मक कार्यपद्धती अवलंबून नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणण्यासाठी आदर्श कार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय व रामानंद आर्य स्वायत्त महाविद्यालय, भांडूप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणे राबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत (एफडीपी) बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे केवळ कारकून निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था आपण आतापर्यंत राबवली, ज्यामध्ये संपूर्णपणे भारतीयत्वाचा अभाव होता. परकीय आक्रमकांनी येथील शिक्षण पद्धती मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा एकदा भारतीय मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले. ६६ पानांच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये २०० पेक्षा जास्त वेळेला शिक्षक हा शब्द आला असून, शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रगतिशील शिक्षक व नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवल्या गेलेल्या रणजित डिसले गुरुजी यांचे उदाहरण देऊन त्यांनी शिक्षकांनी नवनवे प्रयोग केले पाहिजेत, असे नमूद केले.

भारतात अवघी ९०० महाविद्यालये स्वायत्त

‘विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी मूलगामी बदल नवीन शैक्षणिक धोरण सुचवते. निर्धारित अभ्यासक्रमांची पुनर्मांडणी करून विद्यार्थी त्यातून नक्की काय शिकला, हे अधोरेखित करणारे नवे धोरण असले पाहिजे. भारतात असलेल्या ४० हजारपेक्षा अधिक चांगल्या महाविद्यालयांतून केवळ ९०० महाविद्यालयांना स्वायत्तता दर्जा मिळाला आहे. त्या मानाने ही संख्या फारच थोडी आहे. आपल्या परिसरात असलेले उद्योगधंदे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आपण निर्माण करावयास हवे, असेही ते म्हणाले.

-------------

फोटो मेलवर