शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

लेखकात विद्रोहाचे धाडस असावे

By admin | Updated: December 27, 2016 02:47 IST

अनुभव चोरता येतात, मात्र अनुभूती चोरता येत नाही, असे सांगत लेखकाच्या अंगी विद्रोहाचे धाडसही हवे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे

बदलापूर : अनुभव चोरता येतात, मात्र अनुभूती चोरता येत नाही, असे सांगत लेखकाच्या अंगी विद्रोहाचे धाडसही हवे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बदलापूर येथील ‘विचारयात्रा साहित्य संमेलना’त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, आगरी युथ फोरम, ग्रंथसखा वाचनालय, सुहृद एक कलांगण आणि आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बदलापुरातील काटदरे सभागृहात नानासाहेब चापेकर साहित्यनगरीमध्ये हे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या उपस्थितीत, आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना काळे यांनी साहित्यिक आणि लेखकाच्या अंगी असलेल्या गुणांबाबत आपले विचार मांडले. साहित्यिकांचे व्यक्तिमत्त्व हे वैश्विक पातळीवर विचार करणारे असावे, तसेच जगण्याच्या पातळीवर व्यक्तीला संपन्न करण्याची ताकद त्याच्या अंगी असावी, असे विचार त्यांनी मांडले. गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या धाटणीचे साहित्यिक एकाच काळात पाहायला मिळाले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या काळातही पंडित कवींसारखे लेखक होतेच. तसेच कल्पनाविश्वातील ना.सी. फडके असतानाही मर्ढेकरांसारख्या कवींनी अस्पर्श भागाला हात घातला होता. विश्वसाहित्यात मराठीचे स्थान आहे का, हा वि.स. खांडेकर यांचा त्या वेळचा प्रश्नही महत्त्वाचा होता. लेखकाची जीवनदृष्टी ही त्याच्या कृतीतून आणि विचारातून दिसत असते. त्यामुळे जीवनार्थाचे प्रकटीकरण लेखकांच्या हातून व्हावे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. मराठी भाषेवर अतिक्र मण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तरु ण पिढीला मराठीचे आकर्षण वाटले पाहिजे, यासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)- बदलापूर हे बदलाचा स्वीकार करणारे शहर असून त्याला साहित्य संस्कृतीचे वलय आहे. या शहरात या क्षेत्रातील रसिक व अभ्यासक वाढत असल्याने यापुढील साहित्य संमेलन हे बदलापूरमध्ये घेण्याचे आग्रही निमंत्रण या वेळी किसन कथोरे यांनी केले. - मराठी भाषा जगवण्यासाठी मराठी शाळा जगल्या पाहिजेत आणि त्यासाठी शिक्षक जगवणे गरजेचे असल्याचे मत स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी वेळी व्यक्त केले.