शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

कोपर रेल्वे उड्डाणपुलाला आता १५ ऑगस्टचा मुहूर्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजाजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजाजी पथवरील अंडरपास पुलाचे काम संथपणे सुरू आहे. अजूनही या पुलाचा स्लॅब भरला गेलेला नाही. या कामाला विलंब होत असल्याने कोपर पुलाचे काम जुलैअखेर पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे आता १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर पूल खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शहरातील ४५ वर्षे जुना कोपर रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने तो १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने केले जाणार होते. मात्र, एकीकडे या पुलाचा आराखडा उपलब्ध नव्हता, तर दुसरीकडे लॉकडाऊन व पुनर्बांधणीच्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुलाच्या कामाला सुरुवातीलाच विलंब झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनलॉक सुरू होताच या पुलाच्या कामाला गती दिली. मार्च २०२१ अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न होता.

कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या शेजारी पूर्वेला राजाजी पथवरील जुना अंडरपासवरील पूलही कमकुवत झाला होता. त्यामुळे तेथे नवीन पूल उभारण्याचे कामही एकाचवेळी सुरू करण्यात आले. या पुलाच्या गर्डरच्या फेब्रिकेशनचे काम औरंगाबाद येथे करून ते मार्च अखेरीस डोंबिवलीत आणण्यात आले. त्यानंतर दोन टप्प्यांत २१ मीटरचे गर्डर बसवण्यात आले. मेच्या पहिल्या आठवड्यात गर्डर बसवून त्यानंतर स्लॅब टाकणे व इतर कामे लवकर पूर्ण करून जूनअखेर वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले होते.

पावसाने उघडीप देताच काम

पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम व राजाजी पथ ते टंडन रोडच्या रुंदीकरणही झाले आहे. केवळ स्लॅब टाकणे, त्यानंतर डांबराचा सील कोट मारणे ही कामे बाकी होती. मात्र, स्लॅबसाठी लोखंडी सळ्या बांधण्यातच खूप विलंब लागला आहे. आता पावासने पूर्ण उघडीप दिल्यानंतरच स्लॅब भरता येणार आहे. त्यानंतर क्युरिंगसाठी २८ दिवस लागणार आहे. त्यानंतरच डांबराचा सील कोट मारण्यात येणार आहे. या सगळ्या अडचणी पाहता जुलै अखेरपर्यंत कोणत्याही स्थितीत पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे १५ ऑगस्टच्या मुहूर्तावरच पूल खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

------------