शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्याला तब्बल ६०० पाहुण्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:48 IST

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नसली तरी, पश्चिमेकडील मल्हारनगरमधील नवजीवन विद्यामंदिरच्या पटांगणात ...

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नसली तरी, पश्चिमेकडील मल्हारनगरमधील नवजीवन विद्यामंदिरच्या पटांगणात शनिवारी पार पडलेल्या एका लग्न साेहळ्यास तब्बल ५०० ते ६०० पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक वर-वधू पित्यांसह शाळेचे पटांगण लग्नासाठी देणाऱ्या मुख्याध्यापकावर येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पश्चिमेकडील संतोषीमाता रोड परिसरात राहणारे सुभाष गोरे यांच्या दोन मुलींचा लग्न सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. दोघींचे वर हे टिटवाळा आणि कल्याण येथील राहणारे आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दत्तात्रेय देसाई आणि पोलीस हवालदार सी.वाय. चव्हाण हे दोघे गस्त घालत असताना त्यांना लग्न सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास आली. मोकळ्या जागा, लॉन्स, विनावातानुकूलित हॉल याठिकाणी ५० व्यक्तींनाच हजर राहता येईल, असा नियम असताना त्याठिकाणी ६०० च्या आसपास पाहुणे आढळून आले. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्यासाठी पोलीस परवानगीदेखील घेतली नसल्याचे चौकशीत समोर आले. अखेर, लग्नाचे आयोजन करणारे वधूचे पिता सुभाष गोरे, वराचे पिता पंडित धुमाळ, अन्य एका वराचा भाऊ प्रीतेश म्हात्रे यांच्यासह नवजीवन शाळेचे मुख्याध्यापक आर.टी. पाटील अशा चौघांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

-------------