शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

मुरबाड : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य ...

मुरबाड : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुद्ध फसवणूक केली आहे. हे सरकार ओबीसींना आरक्षण देण्याबाबत मुद्दामहून टाळाटाळ करत आहे, असा आराेप भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

ओबीसींच्या आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टात सक्षमपणे बाजू न मांडता राज्यातील सरकारने समाजाची घोर फसवणूक केली आहे. धुळे, नंदुरबार, पालघर जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून ओबीसी समाजाची आंदोलने चिरडण्याचे काम केले आहे. ओबीसी समाजाला गोंजारण्यासाठी तातडीच्या बैठकीचे नाटक यापूर्वी ठाकरे सरकारने केले. पण बैठकीत सरकारने कोणताही प्रस्ताव न ठेवता केवळ विरोधकांची मते जाणून घेतली. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले होते. सरकारला हा गंभीर प्रश्न सोडविण्यात रसच नाही, तर ताे तसाच लाेंबकळत ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे. त्याचा प्रत्यय आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आल्याचेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या तिहेरी चाचणीचा अवलंब करून ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित करणे गरजेचे आहे. इंपिरिकल अहवाल तयार करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राकडे बोटे दाखवून सरकार स्वतःचे अपयश लपवत आहे. सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षण हक्कांवर गदा आणली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. हा अन्याय ओबीसी समाजबांधव सहन करणार नाहीत. राज्य सरकारला याची किंमत मोजवीच लागेल, असा इशाराही कथोरे यांनी दिला आहे.

ओबीसी नेत्यांची पदे राखण्यात धन्यता

सरकारमधील ओबीसी नेते गोड बोलण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेपर्यंत हे ओबीसी नेते झोपले होते का? या नेत्यांनी आता केंद्र सरकारच्या नावाने जुनीच पोपटपंची सुरू केली आहे. फक्त सत्ता हाच या नेत्यांचा हेतू असून, आपली पदे राखण्यातच ते धन्यता मानत आहेत, अशी टीका कथोरे यांनी केली.