शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

मुरबाड : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य ...

मुरबाड : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुद्ध फसवणूक केली आहे. हे सरकार ओबीसींना आरक्षण देण्याबाबत मुद्दामहून टाळाटाळ करत आहे, असा आराेप भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

ओबीसींच्या आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टात सक्षमपणे बाजू न मांडता राज्यातील सरकारने समाजाची घोर फसवणूक केली आहे. धुळे, नंदुरबार, पालघर जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून ओबीसी समाजाची आंदोलने चिरडण्याचे काम केले आहे. ओबीसी समाजाला गोंजारण्यासाठी तातडीच्या बैठकीचे नाटक यापूर्वी ठाकरे सरकारने केले. पण बैठकीत सरकारने कोणताही प्रस्ताव न ठेवता केवळ विरोधकांची मते जाणून घेतली. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले होते. सरकारला हा गंभीर प्रश्न सोडविण्यात रसच नाही, तर ताे तसाच लाेंबकळत ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे. त्याचा प्रत्यय आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आल्याचेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या तिहेरी चाचणीचा अवलंब करून ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित करणे गरजेचे आहे. इंपिरिकल अहवाल तयार करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राकडे बोटे दाखवून सरकार स्वतःचे अपयश लपवत आहे. सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षण हक्कांवर गदा आणली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. हा अन्याय ओबीसी समाजबांधव सहन करणार नाहीत. राज्य सरकारला याची किंमत मोजवीच लागेल, असा इशाराही कथोरे यांनी दिला आहे.

ओबीसी नेत्यांची पदे राखण्यात धन्यता

सरकारमधील ओबीसी नेते गोड बोलण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेपर्यंत हे ओबीसी नेते झोपले होते का? या नेत्यांनी आता केंद्र सरकारच्या नावाने जुनीच पोपटपंची सुरू केली आहे. फक्त सत्ता हाच या नेत्यांचा हेतू असून, आपली पदे राखण्यातच ते धन्यता मानत आहेत, अशी टीका कथोरे यांनी केली.