शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

निवडणुका जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

मुरबाड : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य ...

मुरबाड : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुद्ध फसवणूक केली आहे. हे सरकार ओबीसींना आरक्षण देण्याबाबत मुद्दामहून टाळाटाळ करत आहे, असा आराेप भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

ओबीसींच्या आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टात सक्षमपणे बाजू न मांडता राज्यातील सरकारने समाजाची घोर फसवणूक केली आहे. धुळे, नंदुरबार, पालघर जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून ओबीसी समाजाची आंदोलने चिरडण्याचे काम केले आहे. ओबीसी समाजाला गोंजारण्यासाठी तातडीच्या बैठकीचे नाटक यापूर्वी ठाकरे सरकारने केले. पण बैठकीत सरकारने कोणताही प्रस्ताव न ठेवता केवळ विरोधकांची मते जाणून घेतली. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले होते. सरकारला हा गंभीर प्रश्न सोडविण्यात रसच नाही, तर ताे तसाच लाेंबकळत ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे. त्याचा प्रत्यय आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आल्याचेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या तिहेरी चाचणीचा अवलंब करून ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित करणे गरजेचे आहे. इंपिरिकल अहवाल तयार करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राकडे बोटे दाखवून सरकार स्वतःचे अपयश लपवत आहे. सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षण हक्कांवर गदा आणली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. हा अन्याय ओबीसी समाजबांधव सहन करणार नाहीत. राज्य सरकारला याची किंमत मोजवीच लागेल, असा इशाराही कथोरे यांनी दिला आहे.

ओबीसी नेत्यांची पदे राखण्यात धन्यता

सरकारमधील ओबीसी नेते गोड बोलण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेपर्यंत हे ओबीसी नेते झोपले होते का? या नेत्यांनी आता केंद्र सरकारच्या नावाने जुनीच पोपटपंची सुरू केली आहे. फक्त सत्ता हाच या नेत्यांचा हेतू असून, आपली पदे राखण्यातच ते धन्यता मानत आहेत, अशी टीका कथोरे यांनी केली.