शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ठाण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला

By admin | Updated: July 4, 2017 22:28 IST

रामचंद्रनगर, वैतीवाडी परिसरातील फेरीवाल्यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील चौघांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि.04 -  रामचंद्रनगर, वैतीवाडी परिसरातील फेरीवाल्यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील चौघांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. नयन राठोड या अधिकाऱ्यासह रुपेश पांडे, हाफीज शेख आणि बाळा बोरसे या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून हल्ला करणाऱ्या चंद्रिका तिवारी, संतोष तिवारी आणि संदीप तिवारी या तिघांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या लोकमान्यनगर प्रभाग समितीमधील अतिक्रमण विरोधी पथकातील नयन राठोड हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह रामचंद्रनगर येथील अनधिकृत फलकांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी तिथे रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांनी बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तिथून जाण्याऐवजी या पथकाशी हुज्जत घातली. यातून झालेल्या वादावादीतून त्यांनी पथकावर हल्ला केला. पोलीस बंदोबस्ताशिवाय हे पथक कारवाई करीत असल्यामुळे ते फेरीवाल्यांपुढे हतबल ठरले. यात जखमी झालेल्या राठोड यांच्यासह चौघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तर हल्ला करणाऱ्या चौघांपैकी तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या पथकाने अटक केली. त्यांचा चौथा साथीदार बाळू उतेकर पसार झाला आहे. अनेक फेरीवाल्यांवर कारवाई...फेरीवाल्यांच्या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाल्यानंतर तासाभराने पोलीस बंदोबस्तामध्ये आलेल्या पालिकेच्या दुसऱ्या पथकाने अनेक फेरीवाल्यांवर कारवाई केली. दोन महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला...ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदीराजवळील फेरीवाले आणि दुकानाबाहेर सामान ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर काही फेरीवाले आणि काही गाळे धारकांनी हल्ला केला होता. त्यात माळवी जबर जखमी झाले होते. त्यांच्यावरील या हल्ल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाई अधिक तीव्र करीत फेरीवाले आणि रिक्षा चालक तसेच काही व्यापाऱ्यांवरही पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली होती. आयुक्तांच्या कारवाईचे पडसाद पालिकेच्या महासभेतही उमटले होते.