शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अत्रे रंगमंदिराची डागडुजी होणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:46 IST

देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अद्याप प्रारंभही झालेला नाही

कल्याण : देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अद्याप प्रारंभही झालेला नाही. नाट्यगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरुवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या नाट्यगृहामुळे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रांच्या दुरूस्तीचे कामही लांबणीवर पडले आहे. दरम्यान, दुरूस्तीचे काम करणाºया कंत्राटदारांना लवकरच कार्यादेश दिले जाणार असल्याने अत्रे नाट्यगृहाचे काम मार्च महिन्यात सुरू होईल आणि ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा दावा व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्याच्या अनुषंगाने या रंगमंदिराच्या देखभाल, दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षातील मार्चचा मुहूर्त हुकल्यानंतर दुरूस्तीच्या कामासाठी हे रंगमंदिर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून नाट्यगृह बंदही करण्यात आले. मात्र मुख्य कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बंदची डेडलाईन सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. १ आॅक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, ही डेडलाईन देखील हुकली. दुरूस्तीच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतरही तारीख पे तारीख हा सिलसिला पुढे सुरूच राहिला. दरम्यान दुरूस्ती कामाच्या निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने नाट्यगृहाच्या देखभाल, दुरूस्तीच्या कामाचे तीन भाग करण्यात आले. त्याप्रमाणे प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा मागवली गेली. अखेर याला प्रतिसाद मिळाला, परंतु, अद्यापही संबंधित कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. दुरूस्तीच्या कामाला होत असलेला विलंब पाहता काम सुरू करा अशा सूचना संबंधित कंत्राटदारांना प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यादेश मिळाल्याशिवाय कामाला प्रारंभ नाही अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेणे देखील आवश्यक असून ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मार्चमध्ये काम सुरू होईल, असा दावा जरी व्यवस्थापनाकडून होत असला तरी तो कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.