शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात वातावरण तंग

By admin | Updated: November 30, 2015 23:13 IST

श्रमजीवी संघटना आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करीत असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कोंडीत पकडत आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनाने त्रस्त

वाडा : श्रमजीवी संघटना आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करीत असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कोंडीत पकडत आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनाने त्रस्त झालेल्या मंत्र्यांच्या समर्थनासाठी सोमवारी भाजपने श्रमजीवीच्या विरोधात निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला. मात्र, त्याअगोदरच श्रमजीवीने आंदोलन केल्याने दोन्ही संघटनांचा जमाव आमने-सामने उभा ठाकला. यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. रविवारी भारतीय आदिवासी पँथर्स या संघटनेच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या निवासस्थानावर घंटानाद आंदोलन करण्यासाठी आले होते. या आंदोलकांपैकी काही आंदोलक पोस्ट कार्यालयाजवळ नाश्ता आणण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्ताधारी पक्षाकडून अशा पद्धतीने मारहाण झाल्याने त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने सोमवारी सवरांच्या निवासस्थानासमोर या घटनेचा निषेध मोर्चा काढला. मात्र, हा मोर्चा निवासस्थानाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.यानंतर सवरांच्या समर्थनासाठी त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष व आमदार पास्कल धनारे व नेते बाबाजी काठोले यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवीच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून संघटनेचे नेते विवेक पंडित, सरचिटणीस विजय जाधव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून श्रमजीवी संघटना मंत्री सवरांना बदनाम करीत असल्याचा आरोप काठोले यांनी या वेळी केला.भाजपच्या मोर्चात श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याविरोधात घोषणाबाजी झाल्याने मोर्चा संपवून गेलेले श्रमजीवीचे कार्यकर्ते पुन्हा जमून त्यांनीसुद्धा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही संघटना आमने-सामने आल्याने मोठा संघर्ष निर्माण होण्याचा धोका संभवत होता. मात्र, पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून दोन्ही जमावांना वेगवेगळ्या ठिकाणी रोखून धरण्याची कसरत करावी लागली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणाचे सूत्रधार मंत्री विष्णू सवरा हेच असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रमजीवीने तर विष्णू सवरा यांना उघडपणे आव्हान देणाऱ्या श्रमजीवीचे विजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दोघांनी लावून धरली. (वार्ताहर)