शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

वाड्यात वातावरण तंग

By admin | Updated: November 30, 2015 23:13 IST

श्रमजीवी संघटना आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करीत असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कोंडीत पकडत आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनाने त्रस्त

वाडा : श्रमजीवी संघटना आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करीत असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कोंडीत पकडत आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनाने त्रस्त झालेल्या मंत्र्यांच्या समर्थनासाठी सोमवारी भाजपने श्रमजीवीच्या विरोधात निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला. मात्र, त्याअगोदरच श्रमजीवीने आंदोलन केल्याने दोन्ही संघटनांचा जमाव आमने-सामने उभा ठाकला. यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. रविवारी भारतीय आदिवासी पँथर्स या संघटनेच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या निवासस्थानावर घंटानाद आंदोलन करण्यासाठी आले होते. या आंदोलकांपैकी काही आंदोलक पोस्ट कार्यालयाजवळ नाश्ता आणण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्ताधारी पक्षाकडून अशा पद्धतीने मारहाण झाल्याने त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने सोमवारी सवरांच्या निवासस्थानासमोर या घटनेचा निषेध मोर्चा काढला. मात्र, हा मोर्चा निवासस्थानाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.यानंतर सवरांच्या समर्थनासाठी त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष व आमदार पास्कल धनारे व नेते बाबाजी काठोले यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवीच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून संघटनेचे नेते विवेक पंडित, सरचिटणीस विजय जाधव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून श्रमजीवी संघटना मंत्री सवरांना बदनाम करीत असल्याचा आरोप काठोले यांनी या वेळी केला.भाजपच्या मोर्चात श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याविरोधात घोषणाबाजी झाल्याने मोर्चा संपवून गेलेले श्रमजीवीचे कार्यकर्ते पुन्हा जमून त्यांनीसुद्धा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही संघटना आमने-सामने आल्याने मोठा संघर्ष निर्माण होण्याचा धोका संभवत होता. मात्र, पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून दोन्ही जमावांना वेगवेगळ्या ठिकाणी रोखून धरण्याची कसरत करावी लागली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणाचे सूत्रधार मंत्री विष्णू सवरा हेच असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रमजीवीने तर विष्णू सवरा यांना उघडपणे आव्हान देणाऱ्या श्रमजीवीचे विजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दोघांनी लावून धरली. (वार्ताहर)