शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एटीएम हँग करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:51 IST

एटीएम हँग करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये बॉलीवूडच्या एका निर्मिती व्यवस्थापकाचाही समावेश असून

ठाणे : एटीएम हँग करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये बॉलीवूडच्या एका निर्मिती व्यवस्थापकाचाही समावेश असून, त्यांच्याकडून २६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून, बँक ग्राहकांना लुबाडण्यामध्ये या प्रकरणातील आरोपी सराईत आहेत. एटीएम हँग करायचे किंवा ग्राहकाच्या नकळत त्याचे एटीएम कार्ड बदलायचे, या दोन युक्त्यांचा वापर आरोपींकडून केला जात होता. फसवणुकीसाठी आरोपी मुख्यत्वे ग्राहकांची गर्दी असलेले एटीएम निवड असत. आरोपी एटीएमवर पैसे काढण्यासाठी असलेल्या ग्राहकांच्या रांगेत उभे राहायचे. समोरचा ग्राहक पैसे काढत असताना, आरोपी दोन बोटांमध्ये स्वत:चे कार्ड पकडून कार्डाच्या मागील बोटाने एटीएमचे विशिष्ट बटन सतत दाबायचे. त्यामुळे एटीएम हँग होऊन ग्राहकाचे पैसे निघत नसत. त्या वेळी आरोपी मदतीसाठी पुढे येत असत. आरोपी स्वत:चे कार्ड स्वाइप केल्याचे भासवून प्रत्यक्षात ग्राहकाच्या खात्यातूनच पैसे काढत असत. काही ठिकाणी एटीएम हँग करून गडबडीत ग्राहकांचे एटीएम कार्ड बदलण्याचे प्रकारही आरोपींनी केले आहेत. ग्राहकांना लुटणाºया या टोळीची माहिती ठाण्यातील वागळे युनिट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली. ठाण्यातील अहमदाबाद मार्गावरील नायगाव येथे आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपींना नायगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे १३ एटीएम कार्ड हस्तगत केले. आरोपींनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत अशा प्रकारचे २६ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.साथीदारांचा शोध सुरूया टोळीमध्ये आणखी साथीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी संतोष गिरी हा फिल्म सिटीमध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करतो. फिल्म सिटीसाठी व्हॅनिटी व्हॅन, वेगवेगळ्या कामांसाठी लागणारी मुले आणि लाइटची व्यवस्था पुरविण्याचे कामही तो करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अमिताभ उर्फ आफताब जाहीर आलम खान, संतोष ओमप्रकाश गिरी, कमलेश बिकर्माजित यादव, विजय ओमप्रकाश पांडे, आलोक योगेंद्रप्रताप सिंग आणि अहमद हुसेन आलमगीर खान ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून, ते मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत वास्तव्यास आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून, अमिताभ याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याला उत्तर प्रदेशातून तडीपारही केले होते. त्यामुळे आरोपींनी उत्तर प्रदेशातून बाहेर पडल्यानंतर मुंबई, ठाण्यात फसवणुकीचा धंदा सुरू केला.