शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

बँक संपामुळे एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

ठाणे : केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्याच्या निषेधार्थ देशातील सरकारी बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी १५ आणि ...

ठाणे : केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्याच्या निषेधार्थ देशातील सरकारी बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी १५ आणि १६ मार्च (सोमवार, मंगळवार) रोजी संप पुकारला आहे. ठाणे जिल्ह्यातील बँक कर्मचारीही या संपात सहभागी झाले असून, सोमवारी या कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने प्रदेश सरचिटणीस नीलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन परिसरात मूक निदर्शने केली. संपकरी कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारी पत्रके स्टेशन परिसरात वाटली. शनिवार-रविवारला जोडून सोमवार व मंगळवारी बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. अनेक एटीएममधील रोख रक्कम संपल्याने ग्राहकांना पैशाची चणचण जाणवत आहे.

ठाणे शहरातील बँका बंद आहेत. बंदची हाक देणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचा समावेश आहे.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्टाफ युनियनचे सहचिटणीस दिलीप चव्हाण, ऑफिसर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा अरुणा अग्निहोत्री, विक्रम खराडे, सुबोध गायकवाड, प्रशांत देवस्थळी यांच्या उपस्थितीमध्ये मूक निदर्शने करण्यात आली.

यावेळ नीलेश पवार म्हणाले की, बँक कर्मचारी हे आंदोलन युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या माध्यमातून करीत आहोत. या संपामध्ये देशभरातील सुमारे दहा लाख अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात बँका आणि विमा कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे. राष्ट्रीय मालमत्ता असलेल्या जनतेच्या भांडवलास धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासगी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, पीएमसी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. सार्वजनिक बँकांमध्ये असे घोटाळे होत नाहीत. मात्र, ज्यांनी कर्जे रखडवली, त्यांनाच बँका विकण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्या निषेधार्थ हा लढा उभारण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना स्वातंत्र्य दिले तर त्या देशाची अर्थव्यवस्था तारण्याचे काम करतील, असेही पवार म्हणाले.

..........