शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

‘अस्मिता प्लस’ घेणार महिला, मुलींच्या आरोग्याची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:15 IST

अल्पदरात सॅनिटरी पॅडचा पुरवठा; जिल्हा परिषदेचा पुढाकार

ठाणे : सागरी, नागरी अणि डोंगरी आदी क्षेत्रांत विस्तारलेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भाग लक्षात घेऊन तेथील महिलांसह किशोरवयीन मुलींसाठी 'अस्मिता प्लस' या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करून अल्पदरात सॅनिटरी पॅडचा पुरवठा ठाणे जिल्हा परिषदेकडून केला जात आहे.गावपाड्यांमध्ये ‘अस्मिता प्लस’ योजनेच्या कामाची संपूर्ण जबाबदारी त्यात्या गावांतील महिला बचत गटांकडून पार पाडली जात आहे. शाळकरी मुलींना अवघ्या पाच रुपयांत, तर किशोरी मुलींना आणि महिलांना २४ रुपयांत सॅनिटरी पॅड पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण आदी तालुक्यांतील ३१९ गावपाड्यांमध्ये या ‘अस्मिता प्लस’ योजनेचा लाभ महिला व किशोरींना करून दिला जात आहे. सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील १३१ गावांचा समावेश या योजनेत केला आहे.महिलांना (मुलींना) मासिकपाळीच्या वेळी योग्य काळजीच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील मुली मासिकपाळीच्या कालावधीत घरीच राहतात. तर, काहींनी शाळादेखील सोडल्या आहेत. याशिवाय, या पाळीच्या कालावधीतील काळजीच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्यांनादेखील महिला व मुलींना तोंड द्यावे लागत आहे. महिलांच्या या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषदेने लक्ष केंद्रित करून शाळांमधील विद्यार्थिनींची संख्या कायम राहावी, यासह आरोग्याच्या समस्येतून सुटका व्हावी, या दृष्टिकोनातून ही योजना गांभीर्याने राबविण्यात येत आहे.निधीच्या उपलब्धतेसह बचत गटांना मिळणार रोजगारठाणे : महिला व बालकल्याण विभागाची ही ‘अस्मिता प्लस’ योजना जिल्ह्यात सक्रियपणे राबवण्यात येत आहे. याशिवाय, जिल्हा ग्रामीण विकास विभागाने ही योजना हाती घेतली आहे. तिच्या माध्यमातून बचत गटांना रोजगार देऊन ग्रामीण मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासह आरोग्याच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जागर कार्यक्रमातून ८१९ गावांपैकी ३५१ गावांमध्ये अल्प किमतीत सॅनिटरी पॅडचा पुरवठा केला आहे. या योजनेच्या गावांमधील बचत गटांना १०० पॅडच्या एका पाकिटाची विक्री केल्यास पाकिटामागे ४०० ते ४५० रुपये मिळतात. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात बचत गटांना या योजनेतून उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.