शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:48 IST

बळीराजा मेटाकुटीस: आधी दडी, मग अतिवृष्टी आणि आता ‘अवका‌ळी’

n  लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी संकट लागले आहे. पेरणीला पावसाने ओढ दिली, लावणीला पुन्हा दडी मारल्याने ती खोळंबली, सप्टेंबरनंतर अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके आडवी होऊन कुजू लागली, तर आता थोडे-फार हाती आलेले आणि खळ्यावर गोळा केलेले पीक मळणी करून धान्य घरात आणत असताना, पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात सतत तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.पालघर जिल्ह्यात खरीपाचे १ लाख ५ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भातशेतीचे ७५ हजार, १५ नागली, वरईचे १० हजार, तर इतर पिकाचे ५ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात मुख्य पीक भाताचे घेतले जाते. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. थोडे-फार राहिलेले पीक आता भिजून वाया गेले. या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसान भरपाईची अंमलबजावणी शासनाने केली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी खळ्यातील गंजीवर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले, मात्र पिक भिजलेच. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून अखेरपर्यंत अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही.‘सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी’ डिसेंबरमध्ये थंडीचे दिवस असताना अवकाळी पावसामुळे हवामानातील गारवा व आर्द्रता अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. सध्याच्या या विचित्र अशा हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप येणे, थंडी वाजणे व त्यातून इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात कोरोना फैलावत असून, नागरिकांनी त्या दृष्टीने या का‌ळात आपापल्या आरोग्याची योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सर्वांना केले आहे.