शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:48 IST

बळीराजा मेटाकुटीस: आधी दडी, मग अतिवृष्टी आणि आता ‘अवका‌ळी’

n  लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी संकट लागले आहे. पेरणीला पावसाने ओढ दिली, लावणीला पुन्हा दडी मारल्याने ती खोळंबली, सप्टेंबरनंतर अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके आडवी होऊन कुजू लागली, तर आता थोडे-फार हाती आलेले आणि खळ्यावर गोळा केलेले पीक मळणी करून धान्य घरात आणत असताना, पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात सतत तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.पालघर जिल्ह्यात खरीपाचे १ लाख ५ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भातशेतीचे ७५ हजार, १५ नागली, वरईचे १० हजार, तर इतर पिकाचे ५ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात मुख्य पीक भाताचे घेतले जाते. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. थोडे-फार राहिलेले पीक आता भिजून वाया गेले. या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसान भरपाईची अंमलबजावणी शासनाने केली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी खळ्यातील गंजीवर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले, मात्र पिक भिजलेच. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून अखेरपर्यंत अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही.‘सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी’ डिसेंबरमध्ये थंडीचे दिवस असताना अवकाळी पावसामुळे हवामानातील गारवा व आर्द्रता अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. सध्याच्या या विचित्र अशा हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप येणे, थंडी वाजणे व त्यातून इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात कोरोना फैलावत असून, नागरिकांनी त्या दृष्टीने या का‌ळात आपापल्या आरोग्याची योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सर्वांना केले आहे.