शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

लस न देताच उत्सव करायला सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख लसी दिल्या त्या संपलेल्या असताना लसीचा आणखी पुरवठा न करताच लस उत्सव साजरा करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत जाहीर केले आहे; पण लस न देताच उत्सव साजरा करा सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी स्थिती ओढावली असल्याने संताप व्यक्त होत होत आहे.

मीरा-भाईंदरसाठी सरकारकडून एक लाख सहा हजार ६२० लस पुरविण्यात आल्या होत्या; परंतु गेल्या गुरुवारी रात्री केवळ ३ हजार ३४० लस शिल्लक राहिल्याने महापालिकेने लसीकरण बंद केले आहे. ११ पैकी पालिकेची सहा लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत, तर पाच लसीकरण केंद्रांवर रोज दुसरा डोस बाकी असलेल्या प्रत्येकी १०० लोकांनाच लस दिली जात आहे. कोरोनाचा कहर वाढला असताना दुसरीकडे लसीकरण बंद झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे ११ एप्रिलपासून देशभरात लसीकरण उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे; पण पालिकेकडे लसच नाही, तर उत्सव कसला साजरा करताय असा सवाल नागरिकांनी थेट मोदींना केला आहे.

कोरोनाच्या संसर्गात लोकांचे जीव जात असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र निव्वळ स्वतःची राजकीय पोळी भाजत विरोधकांवर राजकीय सूड उगवीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. राज्याची लोकसंख्या आणि तेथील कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन लसींचे वाटप केंद्रातील मोदी सरकारने करायला हवे होते; परंतु त्यांनी केवळ भाजपशासित राज्यातच जास्त प्रमाणात लसी देऊन विरोधी पक्षांच्या ताब्यातील राज्यांना मात्र तुटपुंजी लस दिल्याचा आरोपही गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक असलेले अनंत आंगचेकर यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे हे घाणेरडे राजकारण देशाला विनाशाच्या आणि सूडाच्या खाईत लोटणारे आहे. लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी यांची गत आहे. लोकांच्या जीव आणि आरोग्याशी खेळणाऱ्या या मोदी सरकारला माफ करता येणार नाही.

------------------

भाजपला कोरोनाची महामारी कितीही पसरली व कितीही लोकांचे बळी गेले तरी त्यांना त्यांची सत्ता आणि राजकारण प्यारे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन केंद्राने लसींचा पुरवठा करणे आवश्यक असताना मोदी आणि भाजप केवळ सूडबुद्धी व आकस ठेवून राज्यातील जनतेवर अत्याचार, अन्याय करीत आहेत. मोदींनी जाहीर केलेला हा लसीकरण उत्सव नसून फसवीकरण उत्सव आहे.

नीलम ढवण, गटनेत्या, शिवसेना

लसीकरण उत्सवाबाबत अजून कोणतेही मार्गदर्शक निर्देश आलेले नाहीत. पालिकेकडे लसींचा साठा नसल्याने लसीकरण उत्सव साजरा करणे उद्या तरी शक्य नाही. सरकारकडे एक लाख लस मागितल्या आहेत. लसींचा पुरवठा झाल्यावर आवश्यक ते सर्व नियोजन करून लसीकरण उत्सव सुरू करणार आहोत.

- डॉ. अंजली पाटील, लसीकरण अधिकारी, महापालिका