शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लस न देताच उत्सव करायला सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख लसी दिल्या त्या संपलेल्या असताना लसीचा आणखी पुरवठा न करताच लस उत्सव साजरा करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत जाहीर केले आहे; पण लस न देताच उत्सव साजरा करा सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी स्थिती ओढावली असल्याने संताप व्यक्त होत होत आहे.

मीरा-भाईंदरसाठी सरकारकडून एक लाख सहा हजार ६२० लस पुरविण्यात आल्या होत्या; परंतु गेल्या गुरुवारी रात्री केवळ ३ हजार ३४० लस शिल्लक राहिल्याने महापालिकेने लसीकरण बंद केले आहे. ११ पैकी पालिकेची सहा लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत, तर पाच लसीकरण केंद्रांवर रोज दुसरा डोस बाकी असलेल्या प्रत्येकी १०० लोकांनाच लस दिली जात आहे. कोरोनाचा कहर वाढला असताना दुसरीकडे लसीकरण बंद झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे ११ एप्रिलपासून देशभरात लसीकरण उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे; पण पालिकेकडे लसच नाही, तर उत्सव कसला साजरा करताय असा सवाल नागरिकांनी थेट मोदींना केला आहे.

कोरोनाच्या संसर्गात लोकांचे जीव जात असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र निव्वळ स्वतःची राजकीय पोळी भाजत विरोधकांवर राजकीय सूड उगवीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. राज्याची लोकसंख्या आणि तेथील कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन लसींचे वाटप केंद्रातील मोदी सरकारने करायला हवे होते; परंतु त्यांनी केवळ भाजपशासित राज्यातच जास्त प्रमाणात लसी देऊन विरोधी पक्षांच्या ताब्यातील राज्यांना मात्र तुटपुंजी लस दिल्याचा आरोपही गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक असलेले अनंत आंगचेकर यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे हे घाणेरडे राजकारण देशाला विनाशाच्या आणि सूडाच्या खाईत लोटणारे आहे. लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी यांची गत आहे. लोकांच्या जीव आणि आरोग्याशी खेळणाऱ्या या मोदी सरकारला माफ करता येणार नाही.

------------------

भाजपला कोरोनाची महामारी कितीही पसरली व कितीही लोकांचे बळी गेले तरी त्यांना त्यांची सत्ता आणि राजकारण प्यारे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन केंद्राने लसींचा पुरवठा करणे आवश्यक असताना मोदी आणि भाजप केवळ सूडबुद्धी व आकस ठेवून राज्यातील जनतेवर अत्याचार, अन्याय करीत आहेत. मोदींनी जाहीर केलेला हा लसीकरण उत्सव नसून फसवीकरण उत्सव आहे.

नीलम ढवण, गटनेत्या, शिवसेना

लसीकरण उत्सवाबाबत अजून कोणतेही मार्गदर्शक निर्देश आलेले नाहीत. पालिकेकडे लसींचा साठा नसल्याने लसीकरण उत्सव साजरा करणे उद्या तरी शक्य नाही. सरकारकडे एक लाख लस मागितल्या आहेत. लसींचा पुरवठा झाल्यावर आवश्यक ते सर्व नियोजन करून लसीकरण उत्सव सुरू करणार आहोत.

- डॉ. अंजली पाटील, लसीकरण अधिकारी, महापालिका