शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:23 IST

‘मुंबई द सिटी युनायटेड’ कार्यक्रम : उलगडले शहराचे अंतरंग

ठाणे : मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मुंबईकरांचे जीवनमान उलगडण्यात आले. अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी कथा, कवितांमधून मुंबईचे दर्शन घडवले. निमित्त होते ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित केलेल्या लिटररी असोसिएशन आणि मराठी वाड्.मय मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याचे.हा सोहळा बुधवारी ‘मुंबई द सिटी युनायटेड’ या कार्यक्रमाने झाला. मुंबईकर, कामगार चळवळ, इथले उद्योगधंदे, खाद्यसंस्कृती, गुन्हेगारी जग, काळाबाजार, वेश्यावस्ती असे सगळी मुंबई व्यापणारे साहित्य ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. अक्षय आणि धनश्री यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांबरोबर, प्राध्यापकांचीही मने जिंकली. विदेशी माणूस पहिल्यांदा मुंबईत येतो, तेव्हा त्याला काय वाटते, हा उतारा धनश्रीने वाचून दाखवला. त्यानंतर मुंबईची खाद्यसंस्कृती, ठाणे ते बोरीबंदर धावलेली लोकल, बाल्या डान्स, डबेवाल्यांची कहाणी, मुंबईतील उद्योगधंदे, मुंबईची गोड आणि काळी बाजू विविध प्रसंगांतून तर कधी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सादर केली. एकेकाळी मुंबईला स्वत:ची लय, गती होती. आज मुंबईचे डिझास्टर झाले आहे, असे सांगून अक्षयने अरुण कोल्हटकरांची ‘चरित्र’ ही कविता सादर केली. अण्णाभाऊ साठे यांची मुंबईची लावणी सादर करताना विद्यार्थ्यांनीही ताल धरला. नामदेव ढसाळ यांची कविता अक्षयने सादर केली. धनश्रीने सादर केलेल्या तन्वीर सिद्दीकी यांची ‘जमलंच तर...’ या कवितेने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहिलेला ब्लॅक फ्रायडे टू ब्लॅक वेद्नस्डे हा लेख वाचून दाखवण्यात आला. ‘घालीन मी साऱ्या ब्रह्मांडास पाठी’ ही नारायण सुर्वेंची कविता सादर झाल्यावर ‘मिसळ झाली मुंबई’ या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी लिटररी असोसिएशनच्या माधुरी पाथरकर, इंग्रजी विभागाच्या प्रमुख ऋणा सजीव, प्रा.डॉ. धनंजय मुळस्कर, प्रा. जितेंद्र हळदणकर, प्रा. रूपाली मुळ्ये, बाबासाहेब कांबळे, तुषार चव्हाण, संतोष पाठारे आदी उपस्थित होते.