शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

बदलापूरमध्ये कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:29 IST

बदलापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आली आहे.

बदलापूर : बदलापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्याचवर्षी बारवी धरण १०० टक्के भरले आहे. या नव्या क्षमतेनुसार बारवी धरणातील पाणी साठाही दुप्पट झाला आहे. मात्र बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाण्यातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कारभारमुळे धरणातील अतिरिक्त पाण्यापासून बदलापूरकर वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील काही अधिकाºयांच्या भोंगळ कारभारामुळे आज अतिरिक्त पाणी असतानाही ते बदलापूरमधील नागरिकांना मिळू शकत नाही. कारण अमृत योजनेतील दुसºया टप्प्यातील पाण्याच्या टाक्या नव्याने बांधणे, नव्याने पाइपलाइन टाकणे यासारखी अनेक महत्वाची कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहेत. या प्रकाराला सर्वस्वी ठाण्यातील मुख्य अभियंत्यांचे कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला आहे.बदलापूर शहारासाठी बारवी धरणातून ५० एमएलडी पाण्याच्या आरक्षणास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र पाणी वितरण करण्यासाठी लागणारी व्यवस्था तयार करण्यात जीवन प्राधिकरण अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता यंदाच्यावर्षी बदलापूरकरांंना बारवी धरणातील अतिरिक्त पाणी मिळणार नाही. नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या नावाने खडे फोडण्यास सुरूवात केली आहे.>नागरिकांकडून सडकून टीकाआधीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या बदलापूरकरांंसाठी जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचा आरोपही कथोरे यांनी केला आहे. एकूणच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारावर आता बदलापूरमधून सडकून टीका होत आहे.