शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बदलापूरमध्ये कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:29 IST

बदलापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आली आहे.

बदलापूर : बदलापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्याचवर्षी बारवी धरण १०० टक्के भरले आहे. या नव्या क्षमतेनुसार बारवी धरणातील पाणी साठाही दुप्पट झाला आहे. मात्र बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाण्यातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कारभारमुळे धरणातील अतिरिक्त पाण्यापासून बदलापूरकर वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील काही अधिकाºयांच्या भोंगळ कारभारामुळे आज अतिरिक्त पाणी असतानाही ते बदलापूरमधील नागरिकांना मिळू शकत नाही. कारण अमृत योजनेतील दुसºया टप्प्यातील पाण्याच्या टाक्या नव्याने बांधणे, नव्याने पाइपलाइन टाकणे यासारखी अनेक महत्वाची कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहेत. या प्रकाराला सर्वस्वी ठाण्यातील मुख्य अभियंत्यांचे कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला आहे.बदलापूर शहारासाठी बारवी धरणातून ५० एमएलडी पाण्याच्या आरक्षणास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र पाणी वितरण करण्यासाठी लागणारी व्यवस्था तयार करण्यात जीवन प्राधिकरण अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता यंदाच्यावर्षी बदलापूरकरांंना बारवी धरणातील अतिरिक्त पाणी मिळणार नाही. नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या नावाने खडे फोडण्यास सुरूवात केली आहे.>नागरिकांकडून सडकून टीकाआधीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या बदलापूरकरांंसाठी जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचा आरोपही कथोरे यांनी केला आहे. एकूणच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारावर आता बदलापूरमधून सडकून टीका होत आहे.