शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

डोंबिवलीतील पदपथावर कमानींचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:25 IST

चालायचे कसे? : पादचाऱ्यांनी विचारला सवाल, मंडपांमुळेही रस्ते अडले

डोंबिवली : खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालक , पादचारी यांना चालणे मुश्कील होऊन बसले आहे. त्यात आता गणेशोत्सवानिमित्त उभारल्या जाणाºया कमानींमुळे पदपथावर अडथळा निर्माण होत असल्याने आम्ही चालायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या वाहतूककोंडीचा सामना करताना पादचाºयांसाठी पदपथ सोयीचे ठरत असले तरी नियम धाब्यावर बसवून कमानी उभारणाºयांवर केडीएमसी कारवाई करणार की कानाडोळा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शहरात गेल्यावर्षी गोकुळाष्टमीला उभारलेल्या कमानी दिवाळीपर्यंत कायम होत्या. परवानगी घ्या आणि शहर विद्रूप करा, असे धोरण यंदाही केडीएमसीने स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर मंडप आणि कमानी उभारणीसाठी नियमावली प्रशासनाकडून जाहीर केली असली तरी कारवाईअभावी ते नियम कागदावरच राहत आहेत.पश्चिमेकडील महात्मा फुले रोडलगतच्या भागात अर्धा रस्ता मंडपाने व्यापलेला आहे. दरवर्षी हे चित्र कायम असते. तो रहदारीचा चौक असल्याने तेथे नेहमीच वाहतूककोंडी होत असते. त्यात मंडपाची भर पडते. दरम्यान, यावेळेलाही काही ठिकाणी लोखंडी कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असताना काही कमानींनी पदपथाचा आधार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.पूर्वेकडील छेडा पथावरील स.वा. जोशी हायस्कूलच्या चौकात उभारलेल्या लोखंडी कमानीने पदपथावर अतिक्रमण केले आहे. सध्या पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने येथील नजीकच्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसह अन्य वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या चौकात प्रचंड कोंडी होत आहे. यात पादचाºयांकडून पदपथाचा वापर केला जातो. परंतु, आता त्यावरच कमान उभारल्याने चालायचे कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.