शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच, महापालिका प्रशासन ढिम्मच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:35 IST

केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे. मात्र, प्रशासनाला त्याचे काही पडलेले नाही, अशी जोरदार टीका बुधवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली.शिवसेनेच्या नगरसेविका शालिनी वायले, छाया वाघमारे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. अनेक रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल, असे आश्वासन स्वत: आयुक्तांनी दिले होते. प्रत्यक्षात त्याप्रकारे काम झालेलेच नाही. गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवणे अपेक्षित होते. मात्र, अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांवर टाकलेली खडी आता इतरत्र पसरली आहे. त्यामुळे खडीवरून वाहने विशेषत: दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले.कल्याण शहर व परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर, स्थायी समितीने १३ कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी मंजूर केल्याने तातडीने कामास सुरुवात झाली. भरपावसाळ्यात खड्डे बुजवले गेले. ते कामही निकृष्ट झाले आहे. आता पाऊस थांबला असूनही खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही. गणेशोत्सवापूर्वी ते होणे गरजेचे होते. याप्रकरणी काय कारवाई करणार, असा सवाल सदस्यांनी केला.कल्याण-मलंग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला होता. तेथील खड्डे अद्याप बुजवलेले नसल्याने त्याकडे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसामुळे हे काम रखडल्याचे कारण प्रशासनाने दिले होते. आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रशासनाने कोणतेच उत्तर दिलेले नाही. या सभेला शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी उपस्थित नसल्याने प्रशासनाने काहीच सांगितले नाही.>टिटवाळ्यातील रस्त्यांची अवस्था बिकटटिटवाळा : शहर आणि ग्रामीण भागांतील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांना खड्डे चुकवत गणेशमूर्ती न्याव्या लागल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. टिटवाळा-फळेगाव रस्त्यावरील रुंदे गावालगतच्या काळू नदीवरील पुलावर खड्डे आहेत. पळसोली ते गेरसेपर्यंत, राया ते खडवली, कोलिंब ते पोई रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील वाजपेयी चौक ते रेल्वे फाटक तसेच गणपती मंदिर चौक ते म्हस्कळफाटा रस्त्यादरम्यान भुयारी गटाराचे काम करण्यात आले. मात्र, रस्त्याची दुर्दशा आहे. शिवसेना शाखा ते निमकरनाका या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. परंतु, कंत्राटदाराच्या मनमानीमुळे येथील रस्त्यांवर वाहन तर सोडाच, पण नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव