शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच, महापालिका प्रशासन ढिम्मच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:35 IST

केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे. मात्र, प्रशासनाला त्याचे काही पडलेले नाही, अशी जोरदार टीका बुधवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली.शिवसेनेच्या नगरसेविका शालिनी वायले, छाया वाघमारे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. अनेक रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल, असे आश्वासन स्वत: आयुक्तांनी दिले होते. प्रत्यक्षात त्याप्रकारे काम झालेलेच नाही. गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवणे अपेक्षित होते. मात्र, अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांवर टाकलेली खडी आता इतरत्र पसरली आहे. त्यामुळे खडीवरून वाहने विशेषत: दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले.कल्याण शहर व परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर, स्थायी समितीने १३ कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी मंजूर केल्याने तातडीने कामास सुरुवात झाली. भरपावसाळ्यात खड्डे बुजवले गेले. ते कामही निकृष्ट झाले आहे. आता पाऊस थांबला असूनही खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही. गणेशोत्सवापूर्वी ते होणे गरजेचे होते. याप्रकरणी काय कारवाई करणार, असा सवाल सदस्यांनी केला.कल्याण-मलंग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला होता. तेथील खड्डे अद्याप बुजवलेले नसल्याने त्याकडे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसामुळे हे काम रखडल्याचे कारण प्रशासनाने दिले होते. आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रशासनाने कोणतेच उत्तर दिलेले नाही. या सभेला शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी उपस्थित नसल्याने प्रशासनाने काहीच सांगितले नाही.>टिटवाळ्यातील रस्त्यांची अवस्था बिकटटिटवाळा : शहर आणि ग्रामीण भागांतील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांना खड्डे चुकवत गणेशमूर्ती न्याव्या लागल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. टिटवाळा-फळेगाव रस्त्यावरील रुंदे गावालगतच्या काळू नदीवरील पुलावर खड्डे आहेत. पळसोली ते गेरसेपर्यंत, राया ते खडवली, कोलिंब ते पोई रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील वाजपेयी चौक ते रेल्वे फाटक तसेच गणपती मंदिर चौक ते म्हस्कळफाटा रस्त्यादरम्यान भुयारी गटाराचे काम करण्यात आले. मात्र, रस्त्याची दुर्दशा आहे. शिवसेना शाखा ते निमकरनाका या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. परंतु, कंत्राटदाराच्या मनमानीमुळे येथील रस्त्यांवर वाहन तर सोडाच, पण नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव