शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

तलवारीच्या धाकाने तरुणाचे अपहरण करणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

ठाणे: पूर्ववैमनस्यातून तलवारीच्या धाकावर अयतीशान खान (१९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील साहिल उर्फ आशू ...

ठाणे: पूर्ववैमनस्यातून तलवारीच्या धाकावर अयतीशान खान (१९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील साहिल उर्फ आशू प्रमोद मिश्रा (२२, रा. हाजुरी, ठाणे) यास वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

अयतीशान खान आणि त्याचा मित्र मौसिम खान हे जिलानीवाडी मस्जिदच्या गेटजवळ वागळे इस्टेट येथे १२ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यावेळी बहाद्दूरसिंग मेहरा, शाहरुख खान, साहिल उर्फ आशू आणि अन्य एक जण असे चौघेजण दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून तिथे आले. त्यांनी तलवारीच्या धाकावर अयतीशान याला त्यांच्या मोटारसायकलवर बसवून ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून श्रीनगर, रामनगर भागातील जंगलात नेले. या टोळक्यापैकी बहाद्दूर याने शाहरूख याच्या हातातील तलवार घेऊन अयतीशान आणि त्याच्या मित्राला शिव्या देऊन तलवारीच्या पुढील टोकाने मौसिम याच्या पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. नंतर या टोळक्याने आपसात संगनमत करून अयतीशान आणि मौसिम या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी शाहरूख याने मौसिम याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून जखमी केले. त्यानंतर पुन्हा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवर बसवून त्यांना काल्हेर येथील टोलनाक्याच्याजवळ नेवून तिथेही पुन्हा लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तुम्हाला आणि तुमच्या आई - वडिलांना ठार मारू, अशी धमकीच बहाद्दूर याने त्यांना दिली. याप्रकरणी १३ जुलै रोजी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ आदींच्या पथकाने यातील आशु उर्फ साहिल याला अटक केली. उर्वरित इतरांचाही शोध सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.