शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

वन्यजीवांच्या तस्करास हैदराबाद येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:18 IST

ठाणे वनविभागाची कारवाई : सात मुनियांसह १६ सुगरण पक्षी जप्त

ठाणे : वन्यप्राणी तसेच पक्ष्यांची रेल्वेने तस्करी करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील अब्दुल नबी ऊर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैदराबाद) याला ठाणे वनविभागाने हैदराबाद येथून नुकतीच अटक केली. त्याच्याकडून ठिपकेदार सात मुनिया पक्षी, तर १६ सुगरण पक्ष्यांची सुटका करण्यात आली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने गुरुवारी दिले. याआधी त्याच्या दोन साथीदारांना ठाणे वनविभागाने अटक केली आहे.

वन्यपक्षी तसेच प्राण्यांची रेल्वेने तस्करी केली जात असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे रेल्वेस्थानकातून १० डिसेंबर रोजी आर.के. मोहम्मद खलील रियाज अहमद (२४, रा. बंगळुरू, कर्नाटक) याला ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून एक घार, तीन शिक्रा, तुरे असलेले एक घुबड आणि एक विदेशी घोरपड असे पाच वन्यजीव ताब्यात घेण्यात आले. त्याला १८ डिसेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्याच्याकडून जप्त केलेले पक्षी हे हैदराबाद येथून खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यातील काही पक्षी हे मुंबई येथील शाहरूख खान (रा. भायखळा) आणि किशन रामपाल (रा. मुंबई) यांना तो विक्री करणार होता. या माहितीच्या आधारे शाहरूखला १२ डिसेंबर रोजी, तर किशनला १४ डिसेंबर रोजी भायखळा भागातून अटक केली. किसन याच्याकडून दोन जांभळ्या रंगाचे पोपट जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही १६ डिसेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, या आरोपींच्या चौकशीतूनच १७ डिसेंबर रोजी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक बी.टी. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल मनोज परदेशी, वनपाल संजय पवार आणि वनरक्षक प्रवीण आव्हाड यांनी हैदराबाद येथून मुख्य आरोपी शेख अब्दुल नबी ऊर्फ परवेज खान याला १७ डिसेंबर रोजी पक्षीविक्री करण्याच्या दुकानातून सात ठिपकेदार मुनिया पक्षी आणि १६ सुगरण पक्षी अशा २३ पक्ष्यांसह अटक केली. या कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळ्या प्रजातींचे ४७ पक्षी आणि सात वन्यप्राणी या आरोपींकडून जप्त केले आहेत. सर्व वन्यप्राणी तसेच पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वन्यजीवविषयक कोणतीही तक्र ार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यानिमित्ताने ठाणे वनविभागाने केले आहे.