शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तस्करीसाठी कासवांची मागणी करणाऱ्याला वनखात्याने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:26 IST

तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेली सुमारे ५३० कासवे येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथून सुमारे १२ दिवसांपूर्वी हस्तगत केली होती.

- सुरेश लोखंडे ठाणे : तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेली सुमारे ५३० कासवे येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथून सुमारे १२ दिवसांपूर्वी हस्तगत केली होती. या कासवांना आणणारी महिला आजही कोठडीत आहे. तिच्या साहाय्याने तस्करीसाठी या कासवांची मागणी करणाºयास वनखात्याच्या यंत्रणेने नुकतीच कुर्ला येथून अटक केली आहे. तोही सध्या तुरुंगात आहे.कर्नाटक , आंध्र प्रदेशातून कासवाची ५३० पिल्ले रेल्वेद्वारे कुर्ला येथे आणण्यात आली होती. कासवांच्या या तस्करीची माहिती वनअधिकाºयांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी सापळा रचून कुर्ला टर्मिनसवर कर्नाटकच्या शोपी (३४) या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडले होते. या महिलेकडून अन्यही तस्करीची माहिती मिळविण्यासह कासवांची मागणी करणाºयाचा शोध वनखात्याच्या यंत्रणेने घेतला. यानुसार, या चौकशी पथकाने कुर्ला (पूर्व) येथील जागृतीनगरमधील रहिवासी अब्दुल कादर इमामसाब हान्नुरे यास अटक केली आहे. सध्या तो ठाणे येथील जेलमध्ये असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तस्करीसाठी आणलेल्या या कासवांना कर्नाटकच्या जंगलात सोडण्यासाठी ठाणे न्यायालयाने तत्काळ परवानगी दिली. कर्नाटकमधील हवामानात जगणाºया या कासवांना तेथे सोडणे अपेक्षित असल्यामुळे काही दिवसांनी कर्नाटक न्यायालयाने तशी परवानगी येथील वनखात्याची मिळवली. सुमारे आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस ठाण्यातील वनखात्याचा पाहुणचार घेणाºया कासवांना वनखात्याच्या पथकांनी कर्नाटकमध्ये सोडल्याचे कंक यांनी सांगितले. तत्पूर्वी या कासवांचे मेडिकल करण्यासह त्यांचे सुस्थितीत खानपानही वनखात्याकडून करण्यात आले. आता त्यांना कर्नाटकटला सोडले आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.