शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बापाचा बदला घेण्यासाठी मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:35 IST

भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळालेल्या आरोपीस भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बिहारमधून अटक केली.आबेद मोहम्मद अजमीर शेख(२०)असे शेजारच्या चार वर्षाच्या मुलीची ...

ठळक मुद्देदुकानातील उधारीवरून बापाने मारहाण केल्याचा रागचार वर्षाच्या मुलीची हत्या करणारा वीस वर्षाचा यंत्रमाग कामगारमुलीचे दोन्ही हात दंडापासून तोडून निर्घुण हत्या

भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळालेल्या आरोपीस भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बिहारमधून अटक केली.आबेद मोहम्मद अजमीर शेख(२०)असे शेजारच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करणाºया आरोपीचे नांव असून तो यंत्रमाग कामगार आहे. शहरातील रोशनबाग येथे मोहमदीया मजीद जवळील गौतमचाळीत महादेव सरजू प्रसाद हे आपल्या कुटूंबासह रहात असून त्याच ठिकाणी त्यांची पानटपरी आहे. शेजारी रहाणा-या आबीदने त्यांच्या पानाच्या दुकानांतून दिड हजार रूपयांचे उधारीचे सामान घेतल्याने महादेव प्रसादने त्यास हटकले. त्यावरून झालेल्या भांडणात महादेव प्रसाद याने आबेदला मारहाण केली. त्याचा राग आल्याने आबीद याने १ एप्रिल रोजी महादेव प्रसादची चार वर्षाची मुलगी पायल ही घराबाहेर खेळत असताना तीचे अपहरण केले होते. त्याच दिवशी तीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात दंडापासून तोडून टाकले. तसेच उजव्या पायाची बोटे तुटलेल्या स्थितीतील मृतदेह घराजवळ असलेल्या टावरे कंपाऊण्ड येथील निर्जनस्थळी झुडूपात टाकून दिले.दरम्यान मुलीचे वडील महादेव प्रसाद याने आपली मुलगी पायल(४)हिचे १ एप्रिल रोजी अपहरण केल्याची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात केली. या दरम्यान पोलीस तपास करीत असताना ४ एप्रिल रोजी गौतमचाळी जवळील टावरे कंपाऊण्डमध्ये झुडूपात सडलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला. तीच्या चपलेवरून मृतदेहाची ओळख पटली. परंतू या मृतदेहाचे हात दंडापासून कापलेल्या स्थितीत आढळून आले होते. पोलीसांनी हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जे.जे.रूग्णालयांत शवविच्छेदनासाठी नेला. तेंव्हा मुलीच्या डोक्यावर प्रहार झाल्याने तीचा मृत्यु झाला असून नंतर तीचे हात कापले आहे.तसेच उजव्या पायाच्या पंजाची बोटे तोडल्याचा शवविच्छेदन अहवाल डॉक्टरानी दिला. त्यानुसार पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यासाठी पोलीसांचे तीन पथक काम करीत होते. गौतमचाळीत पोलीस आल्याचे पाहून आबेदने शहरातून बिहार येथे जाण्यासाठी पळ काढला. तो बिहार येथील मरोना तालुक्यातील गणेशपुर येथील आपल्या घराकडे जात असताना पोलीस त्याच्या मागावर होते. पोलीसांनी त्यास गणेशपुर येथे काल रोजी अटक केली. मयत पायल हिच्या वडीलाने उधारीवरून आबीद शेख यास मारहाण केल्याप्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने पायलचा खून केल्याचे कबूल केले,अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनिल भारव्दाज यांनी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पोलीस सह आयुक्त दिलीप गावीद व भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय भिसे , पोलीस निरिक्षक (गुन्हे) आर.पी.मायने उपस्थित होते.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून