शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

बापाचा बदला घेण्यासाठी मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:35 IST

भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळालेल्या आरोपीस भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बिहारमधून अटक केली.आबेद मोहम्मद अजमीर शेख(२०)असे शेजारच्या चार वर्षाच्या मुलीची ...

ठळक मुद्देदुकानातील उधारीवरून बापाने मारहाण केल्याचा रागचार वर्षाच्या मुलीची हत्या करणारा वीस वर्षाचा यंत्रमाग कामगारमुलीचे दोन्ही हात दंडापासून तोडून निर्घुण हत्या

भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळालेल्या आरोपीस भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बिहारमधून अटक केली.आबेद मोहम्मद अजमीर शेख(२०)असे शेजारच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करणाºया आरोपीचे नांव असून तो यंत्रमाग कामगार आहे. शहरातील रोशनबाग येथे मोहमदीया मजीद जवळील गौतमचाळीत महादेव सरजू प्रसाद हे आपल्या कुटूंबासह रहात असून त्याच ठिकाणी त्यांची पानटपरी आहे. शेजारी रहाणा-या आबीदने त्यांच्या पानाच्या दुकानांतून दिड हजार रूपयांचे उधारीचे सामान घेतल्याने महादेव प्रसादने त्यास हटकले. त्यावरून झालेल्या भांडणात महादेव प्रसाद याने आबेदला मारहाण केली. त्याचा राग आल्याने आबीद याने १ एप्रिल रोजी महादेव प्रसादची चार वर्षाची मुलगी पायल ही घराबाहेर खेळत असताना तीचे अपहरण केले होते. त्याच दिवशी तीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात दंडापासून तोडून टाकले. तसेच उजव्या पायाची बोटे तुटलेल्या स्थितीतील मृतदेह घराजवळ असलेल्या टावरे कंपाऊण्ड येथील निर्जनस्थळी झुडूपात टाकून दिले.दरम्यान मुलीचे वडील महादेव प्रसाद याने आपली मुलगी पायल(४)हिचे १ एप्रिल रोजी अपहरण केल्याची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात केली. या दरम्यान पोलीस तपास करीत असताना ४ एप्रिल रोजी गौतमचाळी जवळील टावरे कंपाऊण्डमध्ये झुडूपात सडलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला. तीच्या चपलेवरून मृतदेहाची ओळख पटली. परंतू या मृतदेहाचे हात दंडापासून कापलेल्या स्थितीत आढळून आले होते. पोलीसांनी हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जे.जे.रूग्णालयांत शवविच्छेदनासाठी नेला. तेंव्हा मुलीच्या डोक्यावर प्रहार झाल्याने तीचा मृत्यु झाला असून नंतर तीचे हात कापले आहे.तसेच उजव्या पायाच्या पंजाची बोटे तोडल्याचा शवविच्छेदन अहवाल डॉक्टरानी दिला. त्यानुसार पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यासाठी पोलीसांचे तीन पथक काम करीत होते. गौतमचाळीत पोलीस आल्याचे पाहून आबेदने शहरातून बिहार येथे जाण्यासाठी पळ काढला. तो बिहार येथील मरोना तालुक्यातील गणेशपुर येथील आपल्या घराकडे जात असताना पोलीस त्याच्या मागावर होते. पोलीसांनी त्यास गणेशपुर येथे काल रोजी अटक केली. मयत पायल हिच्या वडीलाने उधारीवरून आबीद शेख यास मारहाण केल्याप्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने पायलचा खून केल्याचे कबूल केले,अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनिल भारव्दाज यांनी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पोलीस सह आयुक्त दिलीप गावीद व भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय भिसे , पोलीस निरिक्षक (गुन्हे) आर.पी.मायने उपस्थित होते.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून