शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

३० हजार ग्राहकांकडून वसूल केली थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरात महावितरणचे ३५ हजार थकबाकीदार होते. गेल्या सहा महिन्यात या थकबाकीदारांकडून पूर्ण थकबाकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात महावितरणचे ३५ हजार थकबाकीदार होते. गेल्या सहा महिन्यात या थकबाकीदारांकडून पूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली आहे.

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भाग परिसरात जानेवारी महिन्यामध्ये तब्बल ३५ हजार ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी होती. या ग्राहकांकडे बिल वसूल करण्यासाठी महावितरणने मार्चपर्यंत तगादा लावला होता. त्यानंतर बिल भरले जात नसल्याने अधिकाऱ्यांनी थेट ग्राहकांचे वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईनंतर धास्तावलेल्या ग्राहकांपैकी निम्म्या ग्राहकांनी एप्रिल महिन्यात आपली थकबाकी भरून आपला वीजपुरवठा सुरळीत करून घेतला होता. मात्र त्यानंतरही १५ हजारांहून अधिक वीजग्राहकांकडे थकबाकी तशीच शिल्लक होती. जून महिन्यात पुन्हा कारवाई करीत ग्राहकांना थकबाकी भरण्यास भाग पाडले. अनेक ग्राहकांचे रोजगार हिरावले गेल्यामुळे त्यांनी महावितरणकडे थकबाकी भरण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. मात्र नियमाप्रमाणे त्यांना अवघी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. या अल्प कालावधीमुळे अनेक ग्राहकांना वीजबिल भरता आलेले नाही. त्यामुळे महावितरणने मीटर काढून त्या ग्राहकांवर कारवाई केली.

अंबरनाथ शहरात तब्बल ३५ हजार ग्राहकांकडे वीज थकबाकी होती. त्यातील ३० हजार ग्राहकांनी आपली थकबाकी भरून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. मात्र अद्यापही पाच हजाराहून अधिक ग्राहक थकबाकीच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यातील ९० टक्के ग्राहक हे बिल भरण्याची क्षमता नसल्यामुळे अडकून पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यावर काही ग्राहक परस्पर शेजारच्यांकडून वीजपुरवठा घेऊन प्रत्येक दिवस पुढे ढकलण्याचे काम करीत आहेत. अंबरनाथमध्ये ३०० हून अधिक दुकानदारांचे वीजबिल थकीत असून त्यांनी अद्यापही आपली थकबाकी भरलेली नाही.