शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:08 IST

पादचाऱ्यांनी केली मागणी : वाहनतळांअभावी वाहने उभी करायची कुठे?, वाहनचालकांना पडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई महापालिकेने रविवारपासून बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असताना कल्याण-डोंबिवलीतही वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्याची मागणी पादचाºयांकडून होत आहे. मात्र, वाहनतळाअभावी वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. तर, दुसरीकडे पार्किंग धोरणही केडीएमसीने बासनात गुंडाळल्याने वाहतूक व्यवस्थेचा आणि पार्किंगचा खेळखंडोबा कायम राहण्याची शक्यता आहे.बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनांची वाढती संख्या, कुठेही उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतूक व पादचाºयांना होणार अडथळा लक्षात घेता मुंबई महापालिकेने, अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतही अशी कारवाई व्हावी, अशी मागणी पादचारी करीत आहेत.वाहनांच्या संख्येत पडणारी भर पाहता कल्याण-डोंबिवलीतील वाहनतळे अपुरी पडू लागली आहेत. त्यात डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्लीतील वाहनतळाचा एक मजला रिक्षांना आंदण देण्याचा प्रस्ताव नुकताच केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना वाहने पुरेशा वाहनतळाअभावी रस्त्यावरच उभी करावी लागत असताना लोकप्रतिनिधींचे धोरणच एकप्रकारे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याला कारणीभूत ठरत आहे.वाहतूककोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असताना ‘बेशिस्ती’ला चाप लावणारे पार्किंग धोरण माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. रस्त्यांवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणे, कोंडी होणाºया रस्त्यांवर नो पार्किंग, गॅरेज व वाहन खरेदी-विक्री करणाºयांकडून पार्किंग शुल्क आकारणे, कंपन्यांच्या बसना सकाळ व सायंकाळी शहरात प्रवेशबंदी, त्यांचे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट वर्दळीच्या ठिकाणापासून दूर ठवणे तसेच रस्त्यावर अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई आणि रिक्षा स्टॅण्डची फेरआखणी ही पार्किंग धोरणाची प्रमुख वैशिष्ट्य होती. मात्र, जुन्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या इमारतींना पार्किंग शुल्कात सवलत देणे तर सम-विषम तारखेनुसार ठराविक रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी करताना अर्ध्या तासापर्यंत कोणतेही शुल्क न घेणे या मुद्यांचाही अंतर्भाव होता. या धोरणाला महासभेची मान्यताही घेण्यात आली. परंतु, हे धोरण कागदावरच राहिले आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने ठोस कृती झालेली नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी बेशिस्तीला चाप लागणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा फटका कामावर जाणाºया चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांनाही बसतो. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लागलाच पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही कारवाई व्हावी- कांचन क्षीरसागर, पादचारीवाहनचालकांकडून बेकायदा पार्किंग केले जाते, ही वस्तुस्थिती आहे, पण पार्किंगसाठी पुरेशी वाहनतळ नसल्याने वाहने नाइलाजास्तव रस्त्यावरच जागा मिळेल तिथे उभी करावी लागतच आहेत. वाहनतळे बांधणे गरजेचे आहे. अन्यथा वाहने कुठे उभी करायची, याचे स्पष्टीकरण कारवाई करणाºयांनी द्यावे.- स्वप्निल सावंत, दुचाकीचालक