शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:08 IST

पादचाऱ्यांनी केली मागणी : वाहनतळांअभावी वाहने उभी करायची कुठे?, वाहनचालकांना पडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई महापालिकेने रविवारपासून बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असताना कल्याण-डोंबिवलीतही वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्याची मागणी पादचाºयांकडून होत आहे. मात्र, वाहनतळाअभावी वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. तर, दुसरीकडे पार्किंग धोरणही केडीएमसीने बासनात गुंडाळल्याने वाहतूक व्यवस्थेचा आणि पार्किंगचा खेळखंडोबा कायम राहण्याची शक्यता आहे.बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनांची वाढती संख्या, कुठेही उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतूक व पादचाºयांना होणार अडथळा लक्षात घेता मुंबई महापालिकेने, अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतही अशी कारवाई व्हावी, अशी मागणी पादचारी करीत आहेत.वाहनांच्या संख्येत पडणारी भर पाहता कल्याण-डोंबिवलीतील वाहनतळे अपुरी पडू लागली आहेत. त्यात डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्लीतील वाहनतळाचा एक मजला रिक्षांना आंदण देण्याचा प्रस्ताव नुकताच केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना वाहने पुरेशा वाहनतळाअभावी रस्त्यावरच उभी करावी लागत असताना लोकप्रतिनिधींचे धोरणच एकप्रकारे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याला कारणीभूत ठरत आहे.वाहतूककोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असताना ‘बेशिस्ती’ला चाप लावणारे पार्किंग धोरण माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. रस्त्यांवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणे, कोंडी होणाºया रस्त्यांवर नो पार्किंग, गॅरेज व वाहन खरेदी-विक्री करणाºयांकडून पार्किंग शुल्क आकारणे, कंपन्यांच्या बसना सकाळ व सायंकाळी शहरात प्रवेशबंदी, त्यांचे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट वर्दळीच्या ठिकाणापासून दूर ठवणे तसेच रस्त्यावर अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई आणि रिक्षा स्टॅण्डची फेरआखणी ही पार्किंग धोरणाची प्रमुख वैशिष्ट्य होती. मात्र, जुन्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या इमारतींना पार्किंग शुल्कात सवलत देणे तर सम-विषम तारखेनुसार ठराविक रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी करताना अर्ध्या तासापर्यंत कोणतेही शुल्क न घेणे या मुद्यांचाही अंतर्भाव होता. या धोरणाला महासभेची मान्यताही घेण्यात आली. परंतु, हे धोरण कागदावरच राहिले आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने ठोस कृती झालेली नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी बेशिस्तीला चाप लागणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा फटका कामावर जाणाºया चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांनाही बसतो. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लागलाच पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही कारवाई व्हावी- कांचन क्षीरसागर, पादचारीवाहनचालकांकडून बेकायदा पार्किंग केले जाते, ही वस्तुस्थिती आहे, पण पार्किंगसाठी पुरेशी वाहनतळ नसल्याने वाहने नाइलाजास्तव रस्त्यावरच जागा मिळेल तिथे उभी करावी लागतच आहेत. वाहनतळे बांधणे गरजेचे आहे. अन्यथा वाहने कुठे उभी करायची, याचे स्पष्टीकरण कारवाई करणाºयांनी द्यावे.- स्वप्निल सावंत, दुचाकीचालक