शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:08 IST

पादचाऱ्यांनी केली मागणी : वाहनतळांअभावी वाहने उभी करायची कुठे?, वाहनचालकांना पडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई महापालिकेने रविवारपासून बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असताना कल्याण-डोंबिवलीतही वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्याची मागणी पादचाºयांकडून होत आहे. मात्र, वाहनतळाअभावी वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. तर, दुसरीकडे पार्किंग धोरणही केडीएमसीने बासनात गुंडाळल्याने वाहतूक व्यवस्थेचा आणि पार्किंगचा खेळखंडोबा कायम राहण्याची शक्यता आहे.बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनांची वाढती संख्या, कुठेही उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतूक व पादचाºयांना होणार अडथळा लक्षात घेता मुंबई महापालिकेने, अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतही अशी कारवाई व्हावी, अशी मागणी पादचारी करीत आहेत.वाहनांच्या संख्येत पडणारी भर पाहता कल्याण-डोंबिवलीतील वाहनतळे अपुरी पडू लागली आहेत. त्यात डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्लीतील वाहनतळाचा एक मजला रिक्षांना आंदण देण्याचा प्रस्ताव नुकताच केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना वाहने पुरेशा वाहनतळाअभावी रस्त्यावरच उभी करावी लागत असताना लोकप्रतिनिधींचे धोरणच एकप्रकारे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याला कारणीभूत ठरत आहे.वाहतूककोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असताना ‘बेशिस्ती’ला चाप लावणारे पार्किंग धोरण माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. रस्त्यांवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणे, कोंडी होणाºया रस्त्यांवर नो पार्किंग, गॅरेज व वाहन खरेदी-विक्री करणाºयांकडून पार्किंग शुल्क आकारणे, कंपन्यांच्या बसना सकाळ व सायंकाळी शहरात प्रवेशबंदी, त्यांचे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट वर्दळीच्या ठिकाणापासून दूर ठवणे तसेच रस्त्यावर अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई आणि रिक्षा स्टॅण्डची फेरआखणी ही पार्किंग धोरणाची प्रमुख वैशिष्ट्य होती. मात्र, जुन्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या इमारतींना पार्किंग शुल्कात सवलत देणे तर सम-विषम तारखेनुसार ठराविक रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी करताना अर्ध्या तासापर्यंत कोणतेही शुल्क न घेणे या मुद्यांचाही अंतर्भाव होता. या धोरणाला महासभेची मान्यताही घेण्यात आली. परंतु, हे धोरण कागदावरच राहिले आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने ठोस कृती झालेली नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी बेशिस्तीला चाप लागणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा फटका कामावर जाणाºया चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांनाही बसतो. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लागलाच पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही कारवाई व्हावी- कांचन क्षीरसागर, पादचारीवाहनचालकांकडून बेकायदा पार्किंग केले जाते, ही वस्तुस्थिती आहे, पण पार्किंगसाठी पुरेशी वाहनतळ नसल्याने वाहने नाइलाजास्तव रस्त्यावरच जागा मिळेल तिथे उभी करावी लागतच आहेत. वाहनतळे बांधणे गरजेचे आहे. अन्यथा वाहने कुठे उभी करायची, याचे स्पष्टीकरण कारवाई करणाºयांनी द्यावे.- स्वप्निल सावंत, दुचाकीचालक