शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

डंपिंग प्रश्नावर सेना नगरसेवकाचा राजीनामा

By admin | Updated: July 16, 2016 01:53 IST

आधारवाडी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येत्या दीड वर्षात सुटणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असले

कल्याण : आधारवाडी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येत्या दीड वर्षात सुटणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी हा प्रश्न दीड वर्षात काय येत्या पाच वर्षात सुटणार नसल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे दै. ‘लोकमत’च्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात जाहीर केले. इतके नाही तर पाच वर्षांत हा प्रश्न सुटला तर राजकारणातून संन्यास घेईन, असेही जाहीर केले. ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे वाडेघर सर्कल येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. ‘आधारवाडी डंपिंग ग्राऊंड समस्या आणि उपाय’ या स्थानिकांच्या अत्यंत जिव्हाळ््याच्या विषयावरील या चर्चासत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डम्पिंगचा त्रास क्षणोक्षणी सहन करणारे नागरिक आक्रमक झाले होते. त्यांनी केडीएमसीचे अधिकारी आणि नगरसेवक उगले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे उगले यांनी थेट आपल्या राजीनाम्याची घोषणाच केली.या चर्चासत्राला महापालिकेचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, ज्येष्ठ वकील शांताराम दातार, डॉ. नितीन बावस्कर आणि घनकचरा व्यवस्थापन विषयाचे अभ्यासक श्रीकृष्ण भागवत आणि नगरसेवक उगले हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे दै. लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे यांनी उपायुक्त तोरस्कर यांना प्रश्न विचारला की, डंपिंग ग्राऊंड हटविले जावे, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. मात्र ते हटविण्याची प्रक्रिया अद्याप का पूर्ण केली जात नाही. प्रशासनाकडून इतक्या मंदगतीने कार्यवाही का सुरु आहे. नक्की डंपिंग ग्राऊंड कधी बंद होणार आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल. त्यावर तोरस्कर यांनी डंपिंग ग्राऊंड हटविण्यासाठी प्रशासनाकडून शंभर टक्के प्रयत्न सुरु आहे. येत्या दीड वर्षात हे डंपिंग ग्राऊंड हटविण्याची प्रक्रिया केली जाईल. बायोगॅस आणि गांडूळ खताच्या प्रकल्पाचा उल्लेख त्यांनी केला. त्या जागेवर बाग फुलविली जाणार असल्याची ग्वाही दिली. यावर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करीत त्यांचा महापालिकेच्या विरोधातील रोष व्यक्त केला. अनेकांनी संतप्त सूरात प्रश्नांची सरबत्ती केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दै. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि उप सरव्यवस्थापक राघवेंद्र शेठ यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांनी गेली १४ वर्षे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर बेकायदा कचरा टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती दिली व कायद्याच्या या उल्लंघनाकरिता महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरले. घनकचरा व्यवस्थापनतज्ज्ञ श्रीकृष्ण भागवत यांनी कचरा तुम्ही निर्माण करता त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही आपलाही जबाबदारी आहे. प्रशासनावर जबाबदारी टाकून नामानिराळे राहता येणार नाही, अशा शब्दांत नागरिकांचे कान टोचले तर डॉ. नितीन बावस्कर यांनी डम्पिंगशेजारी राहणाऱ्यात श्वसनाचे व त्वचेचे विकार मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याची माहिती दिली.