शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

डंपिंग प्रश्नावर सेना नगरसेवकाचा राजीनामा

By admin | Updated: July 16, 2016 01:53 IST

आधारवाडी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येत्या दीड वर्षात सुटणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असले

कल्याण : आधारवाडी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येत्या दीड वर्षात सुटणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी हा प्रश्न दीड वर्षात काय येत्या पाच वर्षात सुटणार नसल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे दै. ‘लोकमत’च्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात जाहीर केले. इतके नाही तर पाच वर्षांत हा प्रश्न सुटला तर राजकारणातून संन्यास घेईन, असेही जाहीर केले. ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे वाडेघर सर्कल येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. ‘आधारवाडी डंपिंग ग्राऊंड समस्या आणि उपाय’ या स्थानिकांच्या अत्यंत जिव्हाळ््याच्या विषयावरील या चर्चासत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डम्पिंगचा त्रास क्षणोक्षणी सहन करणारे नागरिक आक्रमक झाले होते. त्यांनी केडीएमसीचे अधिकारी आणि नगरसेवक उगले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे उगले यांनी थेट आपल्या राजीनाम्याची घोषणाच केली.या चर्चासत्राला महापालिकेचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, ज्येष्ठ वकील शांताराम दातार, डॉ. नितीन बावस्कर आणि घनकचरा व्यवस्थापन विषयाचे अभ्यासक श्रीकृष्ण भागवत आणि नगरसेवक उगले हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे दै. लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे यांनी उपायुक्त तोरस्कर यांना प्रश्न विचारला की, डंपिंग ग्राऊंड हटविले जावे, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. मात्र ते हटविण्याची प्रक्रिया अद्याप का पूर्ण केली जात नाही. प्रशासनाकडून इतक्या मंदगतीने कार्यवाही का सुरु आहे. नक्की डंपिंग ग्राऊंड कधी बंद होणार आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल. त्यावर तोरस्कर यांनी डंपिंग ग्राऊंड हटविण्यासाठी प्रशासनाकडून शंभर टक्के प्रयत्न सुरु आहे. येत्या दीड वर्षात हे डंपिंग ग्राऊंड हटविण्याची प्रक्रिया केली जाईल. बायोगॅस आणि गांडूळ खताच्या प्रकल्पाचा उल्लेख त्यांनी केला. त्या जागेवर बाग फुलविली जाणार असल्याची ग्वाही दिली. यावर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करीत त्यांचा महापालिकेच्या विरोधातील रोष व्यक्त केला. अनेकांनी संतप्त सूरात प्रश्नांची सरबत्ती केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दै. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि उप सरव्यवस्थापक राघवेंद्र शेठ यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांनी गेली १४ वर्षे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर बेकायदा कचरा टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती दिली व कायद्याच्या या उल्लंघनाकरिता महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरले. घनकचरा व्यवस्थापनतज्ज्ञ श्रीकृष्ण भागवत यांनी कचरा तुम्ही निर्माण करता त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही आपलाही जबाबदारी आहे. प्रशासनावर जबाबदारी टाकून नामानिराळे राहता येणार नाही, अशा शब्दांत नागरिकांचे कान टोचले तर डॉ. नितीन बावस्कर यांनी डम्पिंगशेजारी राहणाऱ्यात श्वसनाचे व त्वचेचे विकार मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याची माहिती दिली.