शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पालिकेतील भरतीत स्थानिकांसाठी सेना आग्रही

By admin | Updated: May 2, 2017 02:32 IST

कित्येक वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेतील आरक्षक भरती प्रक्रिया अखेर मागील वर्षी मार्गी लागल्यानंतर आतापर्यंत ३२७ च्या आसपास

ठाणे : कित्येक वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेतील आरक्षक भरती प्रक्रिया अखेर मागील वर्षी मार्गी लागल्यानंतर आतापर्यंत ३२७ च्या आसपास आरक्षक नव्याने पालिकेत समाविष्ट झाले आहेत. परंतु, यामध्ये ठाणे जिल्ह्यातील केवळ १८ उमेदवारांना संधी मिळाल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक होणार आहे. सत्ताधारी शिवसेनेने स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी हालचाली सुरू केल्या असून येत्या सर्वसाधारण सभेत त्यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी प्रशासन भरती प्रक्रिया राबवत असते. प्रत्येक भरती प्रक्रियेदरम्यान पालिका सेवेत स्थानिकांना सामावून घेण्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून होते. मात्र, भरती प्रक्रि येत स्थानिकांना सेवेत सामावून घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. परिणामी, राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची पालिका सेवेत निवड केली जात असून त्यामध्ये स्थानिकांना फारसा वाव मिळत नाही. ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आरक्षकपदाच्या ३२७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यासाठी राज्यभरातून ४,१४१ उमेदवारांनी भाग घेतला. कित्येक वर्षे ही प्रक्रिया रखडलेली होती. मागील वर्षी ती मार्गी लागून ३२७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरले. जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक ५० उमेदवार पात्र ठरले असून त्यापाठोपाठ नगर ३५, नाशिक २५, नांदेड २५, बीड २३ आणि उर्वरित इतर जिल्ह्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे. भरती प्रक्रि येत जिल्ह्यातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरल्याची बाब उघड होताच सत्ताधारी शिवसेनेने स्थानिकांना नोकरीत कोटा ठरवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात महापौरांशी संपर्क साधला असता, स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे ही परिस्थिती उद््भवल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील १८ उमेदवारांत शहरातील उमेदवारांचा आकडा जेमतेम चार ते पाच आहे. त्यामुळे येत्या सर्वसाधारण सभेपुढे स्थानिकांना पालिका नोकरीमध्ये कोटा ठरवून देण्यासंबंधी प्रस्तावाची सूचना मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.