शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सेनाच दोषी, भाजपा-राष्ट्रवादीचा हल्ला

By admin | Updated: May 5, 2017 06:02 IST

महासभेत अधिकाऱ्यांविरोधात आम्ही बोललोच नाही, असा दावा करून त्यांना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी टार्गेट केल्याचा

ठाणे : महासभेत अधिकाऱ्यांविरोधात आम्ही बोललोच नाही, असा दावा करून त्यांना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी टार्गेट केल्याचा आरोप सेनेने केला असतानाच, भाजपा आणि राष्ट्रवादीनेही आम्ही अधिकाऱ्यांना टार्गेट केले नसल्याचे सांगत इतिवृत्त तपासा, म्हणजे विरोधात कोण बोलले, हे स्पष्ट होईल, असा दावा करून सेनेवर निशाणा साधला आहे. परंतु, या तिन्ही पक्षांतील नगरसेवकांनी जर अधिकाऱ्यांना टार्गेट केले नाही, तर मग त्यांनी नाराजी कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी व्यक्त केली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडण्यासोबतच नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल, तर आम्ही राजीनामे देतो. अशा भावना मांडून अनेक अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. या बजेटच्या चर्चेनंतर अधिकारी व्यथित झाल्यानंतर याचे खापर सेनेवर फोडत असल्याने त्यांनी देखील सावध भूमिका घेऊन महासभेत आम्ही अधिकाऱ्यांच्या किंवा आयुक्तांच्या विरोधात काही बोललोच नसल्याचा दावा केला आहे. सेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपा संकटात सापडल्याने या दोनही पक्षांतील नेत्यांनी सावध भूमिका घेत आम्ही देखील महासभेत प्रशासनाच्या बाजूनेच बोललो होतो. आयुक्तांच्या कामांचे कौतुक केल्याचे सांगितले. सेनेची मंडळी अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेत असल्याचा आरोपही या दोन्ही पक्षांनी केला आहे. सेनेच्या काही नगरसेवकांनी, तर अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप केला होता. आम्ही जर खोटे बोलत असू, तर मीटिंगचे इतिवृत्त तपासा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असेही सुनावले आहेत. आयुक्तांना अंगावर घ्या... आयुक्त आणि त्यांच्याबरोबरच्या अधिकाऱ्यांचे अति झाले असून आता गप्प बसायचे नाही. आयुक्तांना अंगावर घेण्याची वेळ आल्याची चर्चा बजेट मीटिंगच्या आधीच झाली होती, अशी माहिती आता समोर येत असून यावर ज्येष्ठ सेना नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. परंतु, जे चांगले असेल ते चांगलेच म्हणू आणि जे वाईट असेल त्या ठिकाणी प्रशासनाची कानउघाडणीदेखील करू, अशी भूमिका राष्ट्रवादीने या बैठकीतही घेतली होती, अशी माहितीही राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)आम्ही केवळ अधिकाऱ्यांना देण्यात येत असलेल्या अतिरिक्त कारभारावरूनच महासभेत बोललो होतो. परंतु, अधिकारी किंवा आयुक्त काम करीत नाहीत, असे आम्ही बोललेलोच नाही. मागील दोन वर्षांत ठाण्याच्या विकासात आयुक्तांमुळे भरच पडली आहे. - मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते - ठामपाप्रशासनाविरोधात आम्ही बोलण्यापेक्षा कोण बोलले आहे, हे इतिवृत्त तपासल्यास चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेनेने आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे.- संजय वाघुले, नगरसेवक, भाजपा