शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सेनाच दोषी, भाजपा-राष्ट्रवादीचा हल्ला

By admin | Updated: May 5, 2017 06:02 IST

महासभेत अधिकाऱ्यांविरोधात आम्ही बोललोच नाही, असा दावा करून त्यांना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी टार्गेट केल्याचा

ठाणे : महासभेत अधिकाऱ्यांविरोधात आम्ही बोललोच नाही, असा दावा करून त्यांना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी टार्गेट केल्याचा आरोप सेनेने केला असतानाच, भाजपा आणि राष्ट्रवादीनेही आम्ही अधिकाऱ्यांना टार्गेट केले नसल्याचे सांगत इतिवृत्त तपासा, म्हणजे विरोधात कोण बोलले, हे स्पष्ट होईल, असा दावा करून सेनेवर निशाणा साधला आहे. परंतु, या तिन्ही पक्षांतील नगरसेवकांनी जर अधिकाऱ्यांना टार्गेट केले नाही, तर मग त्यांनी नाराजी कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी व्यक्त केली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडण्यासोबतच नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल, तर आम्ही राजीनामे देतो. अशा भावना मांडून अनेक अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. या बजेटच्या चर्चेनंतर अधिकारी व्यथित झाल्यानंतर याचे खापर सेनेवर फोडत असल्याने त्यांनी देखील सावध भूमिका घेऊन महासभेत आम्ही अधिकाऱ्यांच्या किंवा आयुक्तांच्या विरोधात काही बोललोच नसल्याचा दावा केला आहे. सेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपा संकटात सापडल्याने या दोनही पक्षांतील नेत्यांनी सावध भूमिका घेत आम्ही देखील महासभेत प्रशासनाच्या बाजूनेच बोललो होतो. आयुक्तांच्या कामांचे कौतुक केल्याचे सांगितले. सेनेची मंडळी अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेत असल्याचा आरोपही या दोन्ही पक्षांनी केला आहे. सेनेच्या काही नगरसेवकांनी, तर अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप केला होता. आम्ही जर खोटे बोलत असू, तर मीटिंगचे इतिवृत्त तपासा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असेही सुनावले आहेत. आयुक्तांना अंगावर घ्या... आयुक्त आणि त्यांच्याबरोबरच्या अधिकाऱ्यांचे अति झाले असून आता गप्प बसायचे नाही. आयुक्तांना अंगावर घेण्याची वेळ आल्याची चर्चा बजेट मीटिंगच्या आधीच झाली होती, अशी माहिती आता समोर येत असून यावर ज्येष्ठ सेना नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. परंतु, जे चांगले असेल ते चांगलेच म्हणू आणि जे वाईट असेल त्या ठिकाणी प्रशासनाची कानउघाडणीदेखील करू, अशी भूमिका राष्ट्रवादीने या बैठकीतही घेतली होती, अशी माहितीही राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)आम्ही केवळ अधिकाऱ्यांना देण्यात येत असलेल्या अतिरिक्त कारभारावरूनच महासभेत बोललो होतो. परंतु, अधिकारी किंवा आयुक्त काम करीत नाहीत, असे आम्ही बोललेलोच नाही. मागील दोन वर्षांत ठाण्याच्या विकासात आयुक्तांमुळे भरच पडली आहे. - मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते - ठामपाप्रशासनाविरोधात आम्ही बोलण्यापेक्षा कोण बोलले आहे, हे इतिवृत्त तपासल्यास चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेनेने आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे.- संजय वाघुले, नगरसेवक, भाजपा