शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सेना-संघर्ष समिती सामना जाहीर

By admin | Updated: October 16, 2015 01:56 IST

निवडणूक बहिष्कारावर सुरुवातीपासून ठाम असणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण समितीने शेवटच्या दिवशी ऐन वेळी गनिमी कावा करून भाजपाच्या आदेशाने उमेदवारी दाखल केली आहे

अरविंद म्हात्रे, चिकणघरनिवडणूक बहिष्कारावर सुरुवातीपासून ठाम असणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण समितीने शेवटच्या दिवशी ऐन वेळी गनिमी कावा करून भाजपाच्या आदेशाने उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच निवडणूक लढविण्याचा मानस असला तरी ६ ते १२ आॅक्टोबरपर्यंत एकही अर्ज दाखल केला नसल्याने बहिष्काराला शिवसेना साथ देण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, समितीला गाफील ठेवण्याची रणनीती खेळणाऱ्या शिवसेनेलासुद्धा ऐनवेळी उमेदवारी दाखल करून समितीनेही धक्का दिला आहे. १२ तारखेलाच शिवसेनेने डोंबिवली आणि कल्याणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात १२२ जागा लढविण्याचे जाहीर केले, तेव्हा समितीनेही त्यांना शह देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा मार्ग स्वीकारला. आजघडीला २७ गावांत २१ प्रभागांत केवळ १९ प्रभागांतच निवडणूक होणार आहे. दोन प्रभागांत बहिष्कार कायम आहे. तर, १०५ या प्रभागातील उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.>>> शिवसेनेने २७ गावांतून १९ प्रभागांत अर्ज भरले आहेत. कुणालाच उमेदवारी भरू न देणारी समिती सुरक्षा यंत्रणेपुढे नरमली आणि उमेदवारी दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर तिनेही १९ प्रभागांत समांतर अर्ज दाखल करून शिवसेनाविरुद्ध समिती अशा सरळ लढतीचे संकेत दिले. मात्र, तरीही बहिष्कारासाठी समिती शिवसेनेची विविध माध्यमांनी मनधरणी करीत आहे. बसपानेही सर्व जण अर्ज मागे घेणार असतील तर आम्ही मागे घेऊ, असे जाहीर केले आहे. मात्र, आधी कोण अर्ज मागे घेणार, यावरून घोडे अडू शकते. शिवसेना म्हणते, आधी समितीने मागे घ्यावे, पण समितीने सर्व अर्र्ज मागे घेतले आणि शिवसेनेने नाही घेतले तर, अशी धाकधूक समिती व्यक्त करीत असून यावर सर्वांनी एकत्र येऊन अर्ज मागे घेण्यास जावे, असा समितीचा तोडगा आहे. पण, शिवसेना ते मागे घेण्यास अनुकूल नाही. तसे झाले तर शिवसेना आणि समिती यांच्यात सरळ सामना बघायला मिळेल. समितीचे पदाधिकारी रात्रंदिवस गावांत फिरून प्रचार करीत आहेत. निवडणूक जर झालीच तर २ नोव्हेंबरला आचारसंहिता संपल्यावर गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग, निवडणूक लढवून श्रम आणि पैसा का वाया घालवायचा, हा मुद्दा २७ गावांतील ग्रामस्थांना पडला आहे.