शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सेना-संघर्ष समिती सामना जाहीर

By admin | Updated: October 16, 2015 01:56 IST

निवडणूक बहिष्कारावर सुरुवातीपासून ठाम असणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण समितीने शेवटच्या दिवशी ऐन वेळी गनिमी कावा करून भाजपाच्या आदेशाने उमेदवारी दाखल केली आहे

अरविंद म्हात्रे, चिकणघरनिवडणूक बहिष्कारावर सुरुवातीपासून ठाम असणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण समितीने शेवटच्या दिवशी ऐन वेळी गनिमी कावा करून भाजपाच्या आदेशाने उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच निवडणूक लढविण्याचा मानस असला तरी ६ ते १२ आॅक्टोबरपर्यंत एकही अर्ज दाखल केला नसल्याने बहिष्काराला शिवसेना साथ देण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, समितीला गाफील ठेवण्याची रणनीती खेळणाऱ्या शिवसेनेलासुद्धा ऐनवेळी उमेदवारी दाखल करून समितीनेही धक्का दिला आहे. १२ तारखेलाच शिवसेनेने डोंबिवली आणि कल्याणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात १२२ जागा लढविण्याचे जाहीर केले, तेव्हा समितीनेही त्यांना शह देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा मार्ग स्वीकारला. आजघडीला २७ गावांत २१ प्रभागांत केवळ १९ प्रभागांतच निवडणूक होणार आहे. दोन प्रभागांत बहिष्कार कायम आहे. तर, १०५ या प्रभागातील उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.>>> शिवसेनेने २७ गावांतून १९ प्रभागांत अर्ज भरले आहेत. कुणालाच उमेदवारी भरू न देणारी समिती सुरक्षा यंत्रणेपुढे नरमली आणि उमेदवारी दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर तिनेही १९ प्रभागांत समांतर अर्ज दाखल करून शिवसेनाविरुद्ध समिती अशा सरळ लढतीचे संकेत दिले. मात्र, तरीही बहिष्कारासाठी समिती शिवसेनेची विविध माध्यमांनी मनधरणी करीत आहे. बसपानेही सर्व जण अर्ज मागे घेणार असतील तर आम्ही मागे घेऊ, असे जाहीर केले आहे. मात्र, आधी कोण अर्ज मागे घेणार, यावरून घोडे अडू शकते. शिवसेना म्हणते, आधी समितीने मागे घ्यावे, पण समितीने सर्व अर्र्ज मागे घेतले आणि शिवसेनेने नाही घेतले तर, अशी धाकधूक समिती व्यक्त करीत असून यावर सर्वांनी एकत्र येऊन अर्ज मागे घेण्यास जावे, असा समितीचा तोडगा आहे. पण, शिवसेना ते मागे घेण्यास अनुकूल नाही. तसे झाले तर शिवसेना आणि समिती यांच्यात सरळ सामना बघायला मिळेल. समितीचे पदाधिकारी रात्रंदिवस गावांत फिरून प्रचार करीत आहेत. निवडणूक जर झालीच तर २ नोव्हेंबरला आचारसंहिता संपल्यावर गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग, निवडणूक लढवून श्रम आणि पैसा का वाया घालवायचा, हा मुद्दा २७ गावांतील ग्रामस्थांना पडला आहे.