शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सेना-भाजपा आमनेसामने

By admin | Updated: May 11, 2017 02:03 IST

भिवंडी पालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची असा चंग भाजपाने खास करून नवभाजपवाद्यांनी बांधला आहे.

रोहिदास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव : भिवंडी पालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची असा चंग भाजपाने खास करून नवभाजपवाद्यांनी बांधला आहे. त्यामुळेच ते वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करत आहेत. अनधिकृत बांधकाम किंवा कर थकल्याच्या मुद्दयावर इतर पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद होत असताना केवळ मुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याने भाजपा आणि कोणार्क आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केल्याने भिवंडीच्या रिंगणात शिवसेना-भाजपा आमनेसामने आले आहेत. गैरप्रकार करून स्वत:च्या उमेदवारांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालणारा हाच का तुमचा पारदर्शक कारभार? असा सवालही शिवसेनेने केला आहे.उमेदवारी अर्ज छाननीवेळी भाजपाचे गटनेते नीलेश चौधरी, नित्यानंद नाडार तसेच कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. पण थेट मुख्यमंत्र्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आल्यामुळे तिघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले, असा आरोप शिवसेनेचे उमेदवार शरद पाटील यांनी केला. भाजपा आमदार महेश चौघुले यांचे समर्थक मानले जाणारे प्रभाग १८ मधील उमेदवार रवी पाटील यांनी घरपट्टी भरली नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवावा, अशी हरकत काँग्रेसचे सिद्धेश्वर कामूर्ती यांनी घेतली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आणि हरकत ग्राह्य धरत पाटील यांचा अर्ज बाद ठरविला. त्यामुळे नवभाजपावाद्यांनी भाजपाच्या निष्ठावंतांना वेगळा न्याय लावल्याची तिरकस चर्चा सुरू झाली. त्याचवेळी प्रभाग १६ मधील भाजपाचे उमेदवार नित्यानंद नाडार यांची घरपट्टी थकीत असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी हरकत शिवसेनेचे उमेदवार श्रवणकुमार महंतो यांनी घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे तपासली असता घरपट्टी थकल्याचे स्पष्ट झाले. मात्र नाडार यांनी दोन तासांनी थकीत घरपट्टी भरली आणि कागदपत्रे सादर केली. यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. याला महंतो यांनी आक्षेप घेतला. एकाच निकषावर अन्य पक्षाच्या उमेदवारांना एक न्याय आणि भाजपाच्या उमेदवारांना वेगळा न्याय कसा लावला गेला, असा प्रश्न करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज त्वरित बाद करायला हवा होता, असे त्यांचे म्हणणे आहे. भाजपाच्या राजकीय दबावामुळे हे घडल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाचे गटनेते नीलेश चौधरी यांनी वनजमिनीवर अतिक्र मण केल्याचे पुरावे देत शिवसेनेचे उमेदवार नारायण चौधरी यांनी हरकत घेतली. मात्र पुरावे असूनही ती फेटाळण्यात आली. तर भाजपाने समझोता केलेल्या कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख व माजी महापौर विलास पाटील यांनी बेकायदा बांधकाम केल्याचे पुरावे सादर करण्यात आले. तसेच त्यांनी थकीत घरपट्टी न भरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी लेखी हरकत शिवसेनेचे उमेदवार शरद पाटील यांनी घेतली होती. सर्व पुरावे सादर केले होते. त्यावर सुनावणी झाली. पण निर्णय मात्र तीस तासांनी देण्यात आला. या काळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर थेट मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकण्यात आला, असा आरोप आक्षेप घेणारे शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार शरद पाटील यांनी केला. दीर्घकाळ या प्रकरणी सुनावणी झाली. दुसऱ्या दिवसांपर्यंत सुनावणी सुरू होती. पाटील यांच्याविरोधात पुरावे सादर केल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय देणे आवश्यक होते, असा मुद्दा त्यांनी मांडला. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.दुपारी तीननंतर उमेदवारी अर्ज न घेणारे अधिकारी हरकतीवर दीर्घकाळाने निर्णय कसा घेऊ शकतात? अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसविल्याची टीका पाटील यांनी केली. ज्या ठिकाणी हरकती घेण्यात आल्या, तेथे थेट मुख्यमंत्र्यांकडून दबाव आल्यानेच भाजपाच्या आणि त्यांनी समझोता केलेल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले, असे त्यांचे म्हणणे आहे.भाजपाच्या या दबावतंत्रामुळे शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हतबल झाले आहेत. येथे निवडणुकीपूर्वीच गैरप्रकारांत सत्ता जिंकली आणि नियम पाळणाऱ्या सत्याची हार झाली, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.