शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

क्रीडा संकुलावरून रंगणार श्रेयाचा वाद

By admin | Updated: April 12, 2017 03:02 IST

मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रीडा संकुल तीन वर्षांपासून अर्धवट कामामुळे खुले होऊ शकलेले नाही. सध्या ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रीडा संकुल तीन वर्षांपासून अर्धवट कामामुळे खुले होऊ शकलेले नाही. सध्या ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू असून, त्याच्या श्रेयावरून शिवसेना व भाजपात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकाच क्रीडा संकुलाचे तीन वेळा उद्घाटन होत असल्याची कदाचित पहिलीच घटना असावी.सध्या केवळ कॅरम, बुद्धिबळसारखे खेळ सरू झाले असले, तरी अनेकदा बंद असल्याचे खेळाडूंकडून सांगण्यात येत आहे. क्रीडा संकुल स्थानिक खेळाडूंसाठी याच महिन्यात खुले करण्याचा निर्धार राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे. हे संकुल प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येत असून, या प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर व नगरसेवक तारा घरत आहेत. घरत यांनी क्रीडा संकुल खुले करण्यासाठी प्रशासनाकडे सतत पत्रव्यवहार केला होता. अखेर ते सुरू होण्याच्या मार्गावर असताना, संकुल कुणाच्या प्रयत्नाने सुरू झाले, हे मात्र वादात अडकण्याची चिन्हे आहेत. संकुलाच्या पूर्णत्वावर आमगावकर हे सतत लक्ष ठेवून असून, त्यांनी शिवसेनेच्याच प्रयत्नातून संकुल खुले करण्याचा चंग बांधला आहे. त्याच्या उद्घाटनासाठी २१ एप्रिलचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हजर राहाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याची कुणकुण भाजपाला लागताच, त्यांनीदेखील उद्घाटनाची तयारी चालविली आहे. त्यांचा मुहूर्त मात्र, २३ एप्रिलचा असल्याचे सांगण्यात आले. एकाच संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तीन वेळा होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ असून, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रेयाचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उद्घाटनानंतर ते स्थानिक खेळाडूंसाठी खुले व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)तीन वर्षांपासून बंद असलेले संकुल खुले होण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. त्यामुळे त्याचे उद्घाटन प्राधान्याने शिवसेनेकडूनच केले जाईल. शिवाय दुरुस्तीवर आम्हीच लक्ष ठेवून असतो. कोणतेही योगदान नसलेल्या दुसऱ्या पक्षाने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यास, तो सेना स्टाईलने हाणून पाडू. - हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक.क्रीडा संकुल हे पालिकेचे आहे, ते कोणत्या पक्षाचे नाही. त्यातच शहरातील १ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीतून लोकाभिमुख विकास झाला असेल, तर त्याच्या लोकार्पणाचा अधिकार महापौरांचा आहे. त्यांनीच निश्चित केल्याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. - हेमंत म्हात्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष