शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

एप्रिल २०१७ मध्ये ठाणे हागणदरीमुक्त

By admin | Updated: June 21, 2016 01:10 IST

जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे.

ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने वर्षभरात ३४ हजार शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गावे हागणदीमुक्त होणार असल्याचा विश्वास पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘ पर्यावरण संतुलीत गाव, इको व्हीलेज, या उपक्रमास अनुसरून बोरकर यांना बोलते केले असता त्या बोलत होत्या. आता प्रत्येक गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनव्दारे प्रत्येक कुटुंबास वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय सार्वजनीक शौचालये बांधण्यासाठी देखील ग्राम पंचायतींना मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. यासाठी ‘आमचा गाव- आमचा विकास’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १८७ ग्राम पंचायतींचे सर्वेक्षण विकास आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये हागणदरी निर्मुलन विकास आराखडा (ओडीईपी) तयार करून ३४ हजार ९८६ शौलयालये वर्षभरात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक कुटुंबियास सुमारे १२ हजार रूपये प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार आहे.जिल्ह्यातील गावांचा २०१२ मध्ये पायभूत सर्वेक्षण (बीएलएस) करण्यात आले असता सुमारे दोन लाख पाच हजार ४८५ कुटुंबियांकडे शौचालय नव्हते. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ७० हजार ९२८ कुटुबियांना मागील तीन वर्षांत शौचालय बांधून देण्यात आले. यापैकी मागील वर्षभरात २७ हजार ३३४ शौचालये बांधण्यात आली आहेत. याशिवाय आतापर्यंत कल्याण व आंबरनाथ हे दोन तालुके शंभर टक्के हागणदरी मुक्तही झाले आहेत. उर्वरित शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात शौचालये बांधण्यात येणार आहे. वर्षभरात बांधण्यात येणाऱ्या ३४ हजार ९८६ शौचालयांपैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यात २१ हजार ६०० शौचालये बांधली जाणार आहेत. यामध्ये वैयक्तीक शौचालये, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आदीव्दारे ती बांधली जाणार आहेत. त्यांसाठी बारा हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन बांधून घेतले जाणार आहे. यामुळे एप्रिल २०१७ ला ठाणे जिल्हा हागणदरी मुक्त होणार असल्याचा दावा बोरकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)