शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

एप्रिल २०१७ मध्ये ठाणे हागणदरीमुक्त

By admin | Updated: June 21, 2016 01:10 IST

जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे.

ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने वर्षभरात ३४ हजार शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गावे हागणदीमुक्त होणार असल्याचा विश्वास पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘ पर्यावरण संतुलीत गाव, इको व्हीलेज, या उपक्रमास अनुसरून बोरकर यांना बोलते केले असता त्या बोलत होत्या. आता प्रत्येक गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनव्दारे प्रत्येक कुटुंबास वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय सार्वजनीक शौचालये बांधण्यासाठी देखील ग्राम पंचायतींना मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. यासाठी ‘आमचा गाव- आमचा विकास’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १८७ ग्राम पंचायतींचे सर्वेक्षण विकास आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये हागणदरी निर्मुलन विकास आराखडा (ओडीईपी) तयार करून ३४ हजार ९८६ शौलयालये वर्षभरात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक कुटुंबियास सुमारे १२ हजार रूपये प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार आहे.जिल्ह्यातील गावांचा २०१२ मध्ये पायभूत सर्वेक्षण (बीएलएस) करण्यात आले असता सुमारे दोन लाख पाच हजार ४८५ कुटुंबियांकडे शौचालय नव्हते. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ७० हजार ९२८ कुटुबियांना मागील तीन वर्षांत शौचालय बांधून देण्यात आले. यापैकी मागील वर्षभरात २७ हजार ३३४ शौचालये बांधण्यात आली आहेत. याशिवाय आतापर्यंत कल्याण व आंबरनाथ हे दोन तालुके शंभर टक्के हागणदरी मुक्तही झाले आहेत. उर्वरित शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात शौचालये बांधण्यात येणार आहे. वर्षभरात बांधण्यात येणाऱ्या ३४ हजार ९८६ शौचालयांपैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यात २१ हजार ६०० शौचालये बांधली जाणार आहेत. यामध्ये वैयक्तीक शौचालये, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आदीव्दारे ती बांधली जाणार आहेत. त्यांसाठी बारा हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन बांधून घेतले जाणार आहे. यामुळे एप्रिल २०१७ ला ठाणे जिल्हा हागणदरी मुक्त होणार असल्याचा दावा बोरकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)