शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

विटावा ते कोपरी खाडीपुलाला मंजुरी, खाडीवर चौथा पूल, ठाणे पूर्वचा वळसा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:32 IST

कळवा खाडीपुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरू असताना आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान नव्या खाडीपुलाची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे.

- अजित मांडकेठाणे : कळवा खाडीपुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरू असताना आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान नव्या खाडीपुलाची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून येणारी वाहतूक आता थेट या नव्या पुलामुळे कोपरी पूर्वेतून ईस्टर्न एक्स्प्रेसवर जाणार आहे. तसेच सध्याच्या कळवा खाडीवर अस्तित्वात असलेल्या पुलावरील ताण कमी होऊन येथील वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होणार आहे. याशिवाय, कळव्यातून पुढे जाणाºया कळवा ते आत्माराम पाटील चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सेवारस्ता तयार करण्यालाही मान्यता दिल्याने कळव्यातून थेट पारसिकनगर, मुंब्य्राकडे जाणारा रस्ता सुसाट होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांवर अंदाजे ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.सध्या कळवा खाडीपुलावर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तिसºया पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कळवानाका ते विटावा आदी भागांत वाहतूककोंडी होत आहे. हा पूल झाला तरी वाहतूककोंडीची समस्या फारशी सुटणार नसल्याचे दिसत आहे. सध्या कळवा खाडीपुलावर ब्रिटिशकालीन पूल आहे. परंतु, तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुसरा पूल वाहतुकीचा ताण सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आता तिसºया पुलाचे काम वेगाने सुरूआहे. परंतु, एवढे होऊनही कळवानाक्यावर बॉटलनेक असल्याने भविष्यात या ठिकाणी वाहतूककोंडी होणार, हे निश्चित मानले जात होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कळव्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. मागील हिवाळी अधिवेशनातदेखील त्यांनी विटावा ते कोपरी खाडीपूल आणि कळवा ते आत्माराम पाटील चौकापर्यंत रस्त्याचे काम करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आठ दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान खाडीपुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे. तसेच कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्ता रुंदीकरण आणि सेवारस्त्याचा प्रकल्प मार्गी लावण्याबाबतही ग्रीन सिग्नल दिला आहे. या दोन्ही प्रकल्पांची कामे ठाणे महापालिकेने करावीत, असेही शासनाने आदेशात नमूद केले आहे.या पुलाच्या बांधकामासाठी ठाणे महापालिकेला तांत्रिक साहाय्याची आवश्यकता भासल्यास आवश्यकतेनुसार एमएमआरडीएने ते करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.नवी मुंबई तेकोपरी होणार सुसाट१ विटावा ते कोपरी खाडीपूल नवी मुंबईतील पटनी कंपनीपासून ते कोपरी असा दोन किमीचा असणार आहे. या पुलामुळे नवी मुंबईतून ज्यांना मुंबईत जायचे असेल, त्यांना हा शॉर्टकट ठरणार आहे. त्यामुळे कळवानाक्यावर किंवा विटावा पुलाखाली होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.२ या पुलावरून वाहतूक थेट कोपरीमार्गे ईस्टर्न एक्स्प्रेसला जाऊ शकणार आहे. तर, कळवानाक्याजवळ बॉटलनेक असल्याने कळव्यावरून रेतीबंदरपर्यंत जाण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. परंतु, आता या रस्त्याचेदेखील रुंदीकरण करण्यात येणार आहे.३कळवा ते आत्माराम पाटील चौक हा रस्ता सुमारे साडेपाच किमीचा आहे. आता त्याच्या रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाल्याने तो सुसाट होणार आहे. त्यातही या मार्गावर सेवारस्तादेखील होणार असल्याने लहान, हलक्या वाहनांसाठीदेखील हा रस्ता फायदेशीर होणार आहे.४या दोन्ही प्रकल्पांचा खर्च सुमारे ८०० कोटींच्या आसपास असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. एकूणच या दोनही प्रकल्पांमुळे कळव्याचा बॉटलनेक मोकळा होणार असून भविष्यात येथे वाहतूककोंडी नावालादेखील शिल्लक राहणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.मागील पाच वर्षे याबाबत पाठपुरावा सुरू होता. मागील हिवाळी अधिवेशनातदेखील या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आता शासनाने या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने खºया अर्थाने कळव्याची कोंडी फुटणार आहे.- जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र, राष्टÑवादी

टॅग्स :thaneठाणे