शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

आरटीईअंतर्गत २४३ अर्जांना मंजुरी, ७५ मुलांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

मीरा रोड : वंचित व दुर्बल घटकातील मुलांना पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत मीरा-भाईंदरमधील ...

मीरा रोड : वंचित व दुर्बल घटकातील मुलांना पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत मीरा-भाईंदरमधील केवळ २४३ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यापैकी फक्त ७५ मुलांनाच शाळांनी प्रवेश दिला असून आठ पालकांनी एक शाळा मुलांचा अजून प्रवेश निश्चित करत नसल्याने महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.

शासनाच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मीरा-भाईंदरमधील खाजगी शाळांमध्ये आरटीई कायद्याखाली २४३ मुलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ३० जूनपर्यंत प्रवेश घेण्याची असलेली मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली होती. आतापर्यंत केवळ ७५ मुलांचेच शाळांमध्ये प्रवेश झाल्याची कबुली खुद्द पालिकेने दिली आहे.

शाळा प्रवेशाची मुदत आता २३ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे २३ जुलैपर्यंत पालकांनी शाळांमध्ये मुलांचा प्रवेश करून घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी केले आहे.

शासनाकडून पात्र ठरलेल्या २५३ पैकी केवळ ७५ मुलांचेच प्रवेश झाले असल्याने उर्वरित मुलांना प्रवेश का मिळाला नाही ? असा सवाल केला जात आहे. त्यातच भाईंदर पश्चिमेच्या नारायणा या खाजगी शाळेत आरटीई कायद्याखाली मुलांना प्रवेश देण्यास शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याने आठ पालकांनी आयुक्त, शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. शाळा व्यवस्थापन मुलांना प्रवेश देत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत.

काेट

आरटीई कायद्याखाली पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शाळेला पत्र दिले आहे. तरीही प्रवेश दिला जात नसल्याने आपण स्वतः शाळेत जाऊन व्यवस्थापनास निर्देश देणार आहोत. अन्यथा आवश्यक कायदेशीर कारवाई करू़.

-उर्मिला पारधे, शिक्षणाधिकारी