शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाहतूकीचे नियोजन केल्याखेरीज ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:57 IST

वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध दर्शवला आहे.

ठळक मुद्दे नगरसेविका खुशबु चौधरींचा विरोध  सभापती साई शेलार यांचेही आयुक्तांना पत्र

डोंबिवली: वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध दर्शवला आहे.पश्चिमेपेक्षाही तुलनेने पूर्वेला जेथे हा ब्रीज उतरतो त्या ठिकाणी जोशी हायस्कूल नजीक वाहतूक कोंडी होणार असल्याने आधी त्याचे नियोजन कसे असेल याची माहिती द्या. तसेच ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन अवजड वाहने येणार नाहीत. त्यात प्रामुख्याने रेतीचे डम्पर, गॅस सिलेंडर वाहक ट्रक यांसह अन्य अवजड वाहनांची ये-जा नसावी अशीही भूमिका खुशबू चौधरी यांनी घेतली. जो पर्यंत उड्डाणपूल सुरु झाल्यास नियोजन काय असेल हे स्पष्ट केले जात नाही तोपर्यंत त्याचा शुभारंभ होऊ नये असे त्या म्हणाल्या. या मार्गावरुन स्कूल बसेसचीही ये-जा नको असेही त्या म्हणाल्या.साई शेलार यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले आहे की, उड्डाणपूलाच्या शुभारांनंतर ठाकुर्ली चोळे गावात आधीच अरुंद रस्त्यामुळे होणा-या वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनासोबत महापालिकेने चर्चा करावी, आणि बाराबंगला ते शेलार चौक हा मार्ग सुरु करावा. जेणेकरुन कोंडी फुटण्यास मदत मिळेल. त्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय पूल सुरु करणे म्हणजे ठाकुर्लीवासियांचे स्वास्थ हिरावून घेण्यासारखे होईल. आधीच पादचा-यांना चालतांना अनेक अडथळे येतात, त्यात हा पूल सुरु झाल्यावर हजारोंनी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पो आदींसह अन्य वाहनांमध्ये वाढ होणार आहे. त्याचे नेमके नियोजन करण्यात यावे आणि मगच पूलाचा शुभारंभ करण्यात यावा असे ते म्हणाले. या आधीच याच कारणांवरुन माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनीही या उड्डाणपूलास विरोध दर्शवल्याचे सर्वश्रुत आहे. महापालिकेच्या अभियंत्यांसह ज्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला, घाईत भूमीपूनन केले त्या सगळयांनी भविष्यात उद्भवणा-या समस्यांबद्दल काहीच विचार का केला नाही अशी टिका स्थानिकांमधून होत आहे.

टॅग्स :thakurliठाकुर्लीdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका