शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

५० हजार कुटुंबे गॅसशिवाय, उल्हासनगरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:46 IST

शहरातील एक लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी तब्बल ५० हजार कुटुंबांना अजूनही गॅस सिलिंडर मिळू शकलेला नाही. रॉकेल, लाकूड, लागडाचा लगदा, भुसा, गोव-यांवर त्यांचा स्वयंपाक होतो. त्यातून प्रदूषण तर होतेच, पण श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहितीही मिळाली आहे.

उल्हासनगर : शहरातील एक लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी तब्बल ५० हजार कुटुंबांना अजूनही गॅस सिलिंडर मिळू शकलेला नाही. रॉकेल, लाकूड, लागडाचा लगदा, भुसा, गोव-यांवर त्यांचा स्वयंपाक होतो. त्यातून प्रदूषण तर होतेच, पण श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहितीही मिळाली आहे.उल्हासनगरात पूर्व आणि पश्चिम अशी दोन शिधावाटप कार्यालये आहेत. दोन्ही कार्यालयात शिधावाटप कार्डधारकांची संख्या एक लाख ३१ हजार असून त्यापैकी ५० हजार कार्डधारकांकडे गॅसजोडणी नाही. त्यांना स्वयंपाकासाठी चुली पेटवाव्या लागतात. स्टोव्ह वापरावा लागतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोफत गॅस सिलिंडर जोडणी गेली कुठे? असा प्रश्न शिवसेनेच्या अपंग सेलचे भरत खरे यांनी विचारला. याबाबत असंख्य तक्रारी येत असल्याचे ते म्हणाले. एकतर गॅसची योजना फसली असेल किंवा स्वस्त दरात येणारे रॉकेल लाटण्यासाठी कार्डधारकांची संख्या या दुकानांनी फुगवली असेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.शहरातील शिधावाटप अधिकारी शंकर होणमाने आणि जगन्नाथ सानप यांनीही एकूण कार्डधारकांपैकी ४० टक्के धारकांकडे गॅस सिलिंडर नसल्याची माहिती दिली. सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ९२ हजार कार्डधारक येत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न ६९ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना शिधावाटप दुकानांमार्फत गहू दोन रूपये किलो, तर तांदूळ तीन रूपये दराने दिला जातो. पूर्व कार्यालयातील ५६ हजार कार्डधारकांपैकी २१ हजार जणांकडे गॅसजोडणी नाही, तर पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयात ७५ हजार कार्डधारक असून त्यापैकी ३१ हजारांकडे गॅस जोडणी नाही.गरीबांच्या तोंडचा घास पळवलाशिवसेना अपंग सेलचे भरत खरे यांनी शिधावाटप निरीक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप केला. या चुकीमुळे शेकडो नागरिक स्वस्त धान्यापासून वंचित झाल्याचे त्यांनी सांगितले. गरजू नागरिकांच्या समस्या शिधावाटप अधिकांºयांनी सोडवल्या नाहीत तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्बारे दिला.चुकीच्या सर्वेक्षणाचा आरोप : शहरातील तब्बल ४० टक्के कार्डधारकांकडे गॅस जोडणी नसल्याची वस्तुस्थिती असेल तर ती शहराचे आर्थिक आरोग्य किती बिकट आहे ते दाखवते किंवा रॉकेल लाटण्याचा धंदा अजूनही सुरू असल्याने चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोपही होतो आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरulhasnagarउल्हासनगर