शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

५० हजार कुटुंबे गॅसशिवाय, उल्हासनगरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:46 IST

शहरातील एक लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी तब्बल ५० हजार कुटुंबांना अजूनही गॅस सिलिंडर मिळू शकलेला नाही. रॉकेल, लाकूड, लागडाचा लगदा, भुसा, गोव-यांवर त्यांचा स्वयंपाक होतो. त्यातून प्रदूषण तर होतेच, पण श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहितीही मिळाली आहे.

उल्हासनगर : शहरातील एक लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी तब्बल ५० हजार कुटुंबांना अजूनही गॅस सिलिंडर मिळू शकलेला नाही. रॉकेल, लाकूड, लागडाचा लगदा, भुसा, गोव-यांवर त्यांचा स्वयंपाक होतो. त्यातून प्रदूषण तर होतेच, पण श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहितीही मिळाली आहे.उल्हासनगरात पूर्व आणि पश्चिम अशी दोन शिधावाटप कार्यालये आहेत. दोन्ही कार्यालयात शिधावाटप कार्डधारकांची संख्या एक लाख ३१ हजार असून त्यापैकी ५० हजार कार्डधारकांकडे गॅसजोडणी नाही. त्यांना स्वयंपाकासाठी चुली पेटवाव्या लागतात. स्टोव्ह वापरावा लागतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोफत गॅस सिलिंडर जोडणी गेली कुठे? असा प्रश्न शिवसेनेच्या अपंग सेलचे भरत खरे यांनी विचारला. याबाबत असंख्य तक्रारी येत असल्याचे ते म्हणाले. एकतर गॅसची योजना फसली असेल किंवा स्वस्त दरात येणारे रॉकेल लाटण्यासाठी कार्डधारकांची संख्या या दुकानांनी फुगवली असेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.शहरातील शिधावाटप अधिकारी शंकर होणमाने आणि जगन्नाथ सानप यांनीही एकूण कार्डधारकांपैकी ४० टक्के धारकांकडे गॅस सिलिंडर नसल्याची माहिती दिली. सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ९२ हजार कार्डधारक येत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न ६९ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना शिधावाटप दुकानांमार्फत गहू दोन रूपये किलो, तर तांदूळ तीन रूपये दराने दिला जातो. पूर्व कार्यालयातील ५६ हजार कार्डधारकांपैकी २१ हजार जणांकडे गॅसजोडणी नाही, तर पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयात ७५ हजार कार्डधारक असून त्यापैकी ३१ हजारांकडे गॅस जोडणी नाही.गरीबांच्या तोंडचा घास पळवलाशिवसेना अपंग सेलचे भरत खरे यांनी शिधावाटप निरीक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप केला. या चुकीमुळे शेकडो नागरिक स्वस्त धान्यापासून वंचित झाल्याचे त्यांनी सांगितले. गरजू नागरिकांच्या समस्या शिधावाटप अधिकांºयांनी सोडवल्या नाहीत तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्बारे दिला.चुकीच्या सर्वेक्षणाचा आरोप : शहरातील तब्बल ४० टक्के कार्डधारकांकडे गॅस जोडणी नसल्याची वस्तुस्थिती असेल तर ती शहराचे आर्थिक आरोग्य किती बिकट आहे ते दाखवते किंवा रॉकेल लाटण्याचा धंदा अजूनही सुरू असल्याने चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोपही होतो आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरulhasnagarउल्हासनगर