शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत : अनुराधा भोसले 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 27, 2023 18:05 IST

बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली.

ठाणे: शासन म्हणतेय वेठबिगार नाहीत पण प्रत्यक्षात वेठबिगार आहेत. महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत. बालकामगार हा या राज्याला शाप आहे. प्रत्येक बालकामगार आहे म्हणून तो शाळाबाह्य आहे आणि शाळाबाह्य असल्यामुळे तो बालकामगार आहे असे प्रतिपादन बाल कामगारांसाठी झटणाऱ्या अनुराधा भोसले यांनी केले. बालकामगारासारख्या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 

बालकामगारांच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांच्या पायाला दिशा देण्यासाठी अहमदनगरवरून कोल्हापूरला आलेल्या भोसले यांनी बालमजुरीच्या नावाखाली होणारी लहान मुलांची घुसमट, शोषण, अन्याय हे शोधून त्यांच्यासाठी अवनीच्या माध्यमातून त्या पुढे सरसावल्या. त्यांच्या कार्यासाठी समाजसेवक क्षेत्रासाठी त्यांना मृदगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विठ्ठल उमप फाउंडेशन मृदगंध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी बाल कामगारांचे होणारे शोषण याकडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले.

बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी अडीच लाखांमध्ये ऊस तोडायला वीटभट्टी कामगार येतात हे विदारक चित्र पाहिले तर अजून स्वतंत्र मिळायचा आहे का? हा प्रश्न पडतो. गोऱ्हे याना त्या म्हणाल्या की, विधानसभेमध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ऊसतोड कामगारांची मुले शाळेत का जात नाही याचा विचार शासनाने केला पाहिजे. बालकामगारमुक्त भारत असावे आपण क्रिकेटकडे संपूर्ण भाग डोळे लावून बसले होतो भारत जिंकावा यासाठी मनामध्ये प्रार्थना करत होतो. परंतु दुसरीकडे बालकामगारांच्या प्रश्नाकडे आपण पाहत नाही. महाराष्ट्राची बालकामगार हा प्रश्न इतिहास जमा होऊ शकतो त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.