शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

विरोधी आमदारांनीही करावी बिलवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:52 IST

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक

आसनगाव/शहापूर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक मेळावे आणि शिबिरे घेण्यास सांगितले आहे. सरकारचा हा अजब फतवा असून आमदारांना एवढेच काम बाकी होते का, असा सवाल शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच कर्जमाफी आणि वीजबिल तत्काळ माफ करण्याची मागणीही केली आहे.शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. पांडुरंग बरोरा यांना पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या म्हणजेच शेतकºयांकडून वीजबिल भरणा करण्यासंदर्भात आपल्या मतदारसंघात मेळावे तसेच शिबिरे घेऊन महावितरणला सहकार्य करण्याबाबत पत्र पाठवले आहे. तर, कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांचे वीजबिल भरण्यासाठी १५ दिवसांची म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तर, १५ नोव्हें. पर्यंत शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केले जाणार नाही. तसेच मुद्दल रकमेचे पाच हप्ते केले असून हे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी भरावयाचे आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.या पत्रामुळे आ. बरोरा नाराज असून शेतकºयांना कर्जमाफी न दिल्याने तसेच परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.