शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी आमदारांनीही करावी बिलवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:52 IST

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक

आसनगाव/शहापूर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक मेळावे आणि शिबिरे घेण्यास सांगितले आहे. सरकारचा हा अजब फतवा असून आमदारांना एवढेच काम बाकी होते का, असा सवाल शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच कर्जमाफी आणि वीजबिल तत्काळ माफ करण्याची मागणीही केली आहे.शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. पांडुरंग बरोरा यांना पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या म्हणजेच शेतकºयांकडून वीजबिल भरणा करण्यासंदर्भात आपल्या मतदारसंघात मेळावे तसेच शिबिरे घेऊन महावितरणला सहकार्य करण्याबाबत पत्र पाठवले आहे. तर, कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांचे वीजबिल भरण्यासाठी १५ दिवसांची म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तर, १५ नोव्हें. पर्यंत शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केले जाणार नाही. तसेच मुद्दल रकमेचे पाच हप्ते केले असून हे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी भरावयाचे आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.या पत्रामुळे आ. बरोरा नाराज असून शेतकºयांना कर्जमाफी न दिल्याने तसेच परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.