शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

आणखी ५० द.ल.ली. पाणी हवे

By admin | Updated: May 30, 2017 05:32 IST

शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर मीना आयलानी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. पाणीचोरीकरिता कुप्रसिद्ध असलेल्या शहराला जादा पाण्याची सोय करताना मुख्य जलवाहिनीवर मीटर बसवण्याची सूचनाही आयलानी यांनीच केली.उल्हासनगरातील ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प पडली असून गळतीमुळे लाखो लीटर पाणी नाल्यात जात आहे. पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीची मागणी महापालिका राज्य व केंद्र शासनाकडे करणार आहे. तत्पूर्वी पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा देण्याकरिता अतिरिक्त ५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी आयलानी यांनी केली. सध्या एमआयडीसीकडून पाठवण्यात येणारे पाणीबिल हे कोट्यवधी रुपयांचे असून ते भरण्याची महापालिकेची क्षमता नसल्याने बिल माफ करण्याची विनंती महापौरांनी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने उद्योगमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात महापौर आयलानी यांच्यासह उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कांचन लुंड, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा यांचा समावेश होता. उल्हासनगरला सध्या दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कपात लागू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार तब्बल ४० टक्के पाणीगळतीमुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आहे. यामुळे पाणी असूनही अनेकदा नागरिकांना टंचाईचा सामाना करावा लागतो.