शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

आणखी ५० द.ल.ली. पाणी हवे

By admin | Updated: May 30, 2017 05:32 IST

शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर मीना आयलानी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. पाणीचोरीकरिता कुप्रसिद्ध असलेल्या शहराला जादा पाण्याची सोय करताना मुख्य जलवाहिनीवर मीटर बसवण्याची सूचनाही आयलानी यांनीच केली.उल्हासनगरातील ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प पडली असून गळतीमुळे लाखो लीटर पाणी नाल्यात जात आहे. पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीची मागणी महापालिका राज्य व केंद्र शासनाकडे करणार आहे. तत्पूर्वी पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा देण्याकरिता अतिरिक्त ५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी आयलानी यांनी केली. सध्या एमआयडीसीकडून पाठवण्यात येणारे पाणीबिल हे कोट्यवधी रुपयांचे असून ते भरण्याची महापालिकेची क्षमता नसल्याने बिल माफ करण्याची विनंती महापौरांनी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने उद्योगमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात महापौर आयलानी यांच्यासह उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कांचन लुंड, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा यांचा समावेश होता. उल्हासनगरला सध्या दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कपात लागू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार तब्बल ४० टक्के पाणीगळतीमुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आहे. यामुळे पाणी असूनही अनेकदा नागरिकांना टंचाईचा सामाना करावा लागतो.