शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संतप्त पालक गुरुवारी जाणार मुंबईत

By admin | Updated: March 23, 2017 01:27 IST

आरटीईअंतर्गत प्रवेश योजनेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ठाण्यातील पालकांनी शनिवारी आंदोलन केल्यावरही पालकांची परवड सुरूच

ठाणे : आरटीईअंतर्गत प्रवेश योजनेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ठाण्यातील पालकांनी शनिवारी आंदोलन केल्यावरही पालकांची परवड सुरूच आहे. त्यासंदर्भात, पालकांनी मंगळवारी प्राथमिकच्या जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव यांना निवेदन दिले. त्याला कोणतेही प्रतिसादात्मक उत्तर न मिळाल्याने आता ठाण्यातील संतप्त आणि हतबल पालक गुरुवारी शिक्षण उपसंचालक, मुंबई बी.बी. चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. आरटीई प्रवेश योजनेचा पहिला टप्पा सोमवारी संपणार होता. मात्र, अखेरपर्यंत सुरू असलेल्या गोंधळामुळे ती मुदतही मंगळवारपर्यंत वाढवली. काही शाळांनी प्रवेश दिले. परंतु, प्रवेशानंतर त्यांनी शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालकांकडून पैशांची मागणी केली. आरटीई कायद्यांतर्गत शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना मोफत आहे. असे असतानाही शाळा पालकांची अडवणूक करत असल्याने मंगळवारी पालकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यादव यांना निवेदन दिले. या निवेदनाला शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे सांगून संतप्त पालक, विद्यार्थ्यांसह गुरुवारी मुंबई शिक्षण उपसंचालक चव्हाण यांना भेटण्याचा निर्णय डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)