शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

संतप्त पालक गुरुवारी जाणार मुंबईत

By admin | Updated: March 23, 2017 01:27 IST

आरटीईअंतर्गत प्रवेश योजनेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ठाण्यातील पालकांनी शनिवारी आंदोलन केल्यावरही पालकांची परवड सुरूच

ठाणे : आरटीईअंतर्गत प्रवेश योजनेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ठाण्यातील पालकांनी शनिवारी आंदोलन केल्यावरही पालकांची परवड सुरूच आहे. त्यासंदर्भात, पालकांनी मंगळवारी प्राथमिकच्या जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव यांना निवेदन दिले. त्याला कोणतेही प्रतिसादात्मक उत्तर न मिळाल्याने आता ठाण्यातील संतप्त आणि हतबल पालक गुरुवारी शिक्षण उपसंचालक, मुंबई बी.बी. चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. आरटीई प्रवेश योजनेचा पहिला टप्पा सोमवारी संपणार होता. मात्र, अखेरपर्यंत सुरू असलेल्या गोंधळामुळे ती मुदतही मंगळवारपर्यंत वाढवली. काही शाळांनी प्रवेश दिले. परंतु, प्रवेशानंतर त्यांनी शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालकांकडून पैशांची मागणी केली. आरटीई कायद्यांतर्गत शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना मोफत आहे. असे असतानाही शाळा पालकांची अडवणूक करत असल्याने मंगळवारी पालकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यादव यांना निवेदन दिले. या निवेदनाला शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे सांगून संतप्त पालक, विद्यार्थ्यांसह गुरुवारी मुंबई शिक्षण उपसंचालक चव्हाण यांना भेटण्याचा निर्णय डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)