शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

अंगणवाड्यांना स्मार्ट टच; ठाणे जिल्हा परिषदेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:43 IST

ठाणे जिल्हा परिषदेचा पुढाकार : १३२ अंगणवाड्यांचे पालटणार रूपडे

ठाणे : तुटकी व गळकी छपरे, मोडकळीस आलेले दरवाजे व खिडक्या, मुलांना बसण्यासाठी आसनव्यवस्था नसणे, अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील अंगणवाड्यांची झाली आहे. यामुळे या अंगणवाड्यांना नवे रूपडे देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने पावले उचलली आहेत. यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांतर्गत ८२ अंगणवाड्या, तर जिल्हा परिषद निधीतून ५० अशा १३२ अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यात शासनाकडून स्मार्ट करण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद निधीतून स्मार्ट करण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बाल्यावस्था ही मानवाच्या वाढ व विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने बालकांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ सहा वर्षे वयोगटापासून होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

सध्या ठाणे जिल्ह्यात एक हजार ८५४ आंगणवाड्या आहेत. त्यापैकी एक हजार ९२ अंगणवाड्या मालकीच्या जागेत भरतात. तर, ७७४ अंगणवाड्या समाजमंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरत आहेत. त्यामुळे या अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही पावले उचलली आहेत.  जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणे अंगणवाड्यादेखील हायटेक व स्मार्ट करण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्यात चांगले वातावरण मुलांना उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे