शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

...आणि त्यांनीही हाती घेतला झाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:17 IST

शहरात साठणाऱ्या कच-याच्या ढिगा-यांकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना काही विभागांमध्ये नियमित होणाºया साफसफाईचेही तीन तेरा वाजले आहेत

कल्याण : शहरात साठणाऱ्या कचºयाच्या ढिगाºयांकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना काही विभागांमध्ये नियमित होणाºया साफसफाईचेही तीन तेरा वाजले आहेत. कुष्ठरूग्णांची वसाहत असलेल्या हनुमाननगरमधील साफसफाई अभावी तुंबलेली गटारे आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचºयाकडे महापालिकेच्या कर्मचाºयांनी कानाडोळा केल्याने या वसाहतीतील तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छता मोहीम हाती घ्यावी लागली आहे. शुक्रवारी संपूर्ण परिसराची स्वच्छता केल्यानंतर सोमवारी देखील हे अभियान राबवले जाणार आहे.कुष्ठरुग्णांची वसाहत म्हणून कचोरे हनुमान नगर परिसराची ओळख आहे. याठिकाणी कुष्ठरूग्ण आणि त्यांच्या कुटुंबांची मोठी वसाहत वास्तव्याला आहे. हा भाग विकासाच्या दृष्टीने नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. सर्वत्र स्वच्छता राखण्याचे आवाहन केडीएमसीच्या वतीने केले जात आहे. केडीएमसीची यंत्रणा इतरत्र प्रभावीपणे राबत असताना या वसाहतीकडे मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. गटारांची नियमितपणे साफसफाई होत नाही. त्यात कचराही वेळच्यावेळी उचलला जात नाही. यात पावसाळा सुरू झाल्याने ही परिस्थिती रोगराईला आमंत्रण देणारी ठरली आहे. या एकूणच परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याने वसाहतीमधील नागरिकांनाच स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.शुक्रवारी येथील तरूण आणि ज्येष्ठ नागरिकांनी हे स्वच्छता अभियान राबविले. हनुमान नगर कुष्ठपिडीत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्यासह संतोष वाघमारे, अजय कोठारे, दत्तू गोळे, हजरतअली शेख, कमलाकर भडकवाढ, एमनाथप्पा गायकवाड, श्रीकांत कोटुरकर यांसह तरूण मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला.हनुमाननगर वसाहतीचा परिसर मोठा असल्याने काही भागाची स्वच्छता शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये श्रीकृष्ण मंदिर परिसरासह वसाहतीचा मुख्य भाग स्वच्छ करण्यात आला. सोमवारी पुन्हा एकदा अभियान राबवून वसाहतीच्या उर्वरीत भागात स्वच्छता करण्यात येणार आहे.वसाहतीत नियमितपणे होत नसलेल्या साफसफाईबाबत महापौर विनीता राणे यांचेही लक्ष वेधण्यात आले होते. सफाई कामगार पाठविले जातील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतू आजतागायत कोणीही कामगार याठिकाणी आलेला नाही. वसाहतीमधील वाढत जाणारी अस्वच्छता पाहता अखेर आम्हालाच पुढाकार घ्यावा लागला, असे हनुमान नगर महाराष्ट्र कुष्ठपिडीत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी सांगितले.त्यामुळे परिस्थिती उद्भवली : हनुमान नगर वसाहतीत प्रभावीपणे साफसफाई होत नाही ही वस्तूस्थिती आहे. सध्या कर्मचारी वर्गाची वानवा जाणवते आहे. तरीपण कर्मचारी वर्ग वाढवून तेथील साफसफाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया केडीएमसी डोंबिवली विभागाचे सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली.