शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

...आणि मदत स्वीकारण्यापूर्वीच डॉ. भीमराव गस्तींनी घेतला निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:33 IST

समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले.

 बदलापूर : समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले. पण त्यावर काही निर्णय घेऊन मदत पोचेपर्यंत सर्वांना ऋणात ठेवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या मित्रपरिवाराला कायमची चुटपूट लावून ते गेले!भीमरावांचे हे पत्र त्यांचे अखेरचे पत्र ठरले. त्यांनी ३१ जुलैला बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेचे कार्यवाह आणि त्यांचे स्नेही श्रीकांत देशपांडे यांना लिहिलेले पत्र बदलापूरच्या स्नेह्यांना ४ आॅगस्टला मिळाले. त्यांना कशापद्धतीने ठोस मदत करता येईल, यावर विचार करून निर्णय घेण्याच्या आत डॉ. भीमरावांनी जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त आल्याने बदलापुरातील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेत शोककळा पसरली.डॉ. गस्ती यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, मी जीवनभर लोकसेवाच केली. स्वत:साठी काही करू शकलो नाही. सध्या इकडे संस्थेत शिकणाºया देवदासी मुलींची संख्याही वाढली आहे. परिणामी संस्थेचा खर्चही वाढला, व्याप वाढला, प्रवासही वाढला. त्यामुळे माझ्या आरोग्याकडे माझेच पूर्ण दुर्लक्ष झाले. सध्या मी आजारी असून हैदराबाद येथील रु ग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत. हे उपचार खर्चिक होत असून त्याचा सारा भार कार्यकर्त्यांच्या अंगावर पडतो आहे. त्यामुळे मला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. जे जवळचे व आत्मीय मित्र आहेत त्यांनाच सांगतो आहे. या मदतीमुळे मी बरा होईन. अजून तसे खूप काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी पत्रात आपल्या बँकेचा खाते क्रमांकही दिला आहे.अंबरनाथच्या एज्युकेशन सोसायटीने संस्थापक भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरु केलेला पहिला दधिची पुरस्कार १९९८ मध्ये डॉ. भीमराव गस्ती यांना देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेनेही सुरु केलेला पहिला योगी अरविंद पुरस्कार २०११ मध्ये डॉ. गस्ती यांना देण्यात आला होता.संस्थांशी ऋणानुबंध असल्याने त्यांचे पत्र मिळताच मदतीबाबत मित्रांशी चर्चाही झाली. आठवडाभरात आम्ही हैदराबादला प्रत्यक्ष जाणारही होतो. मात्र सकाळीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे कळल्याने मन सुन्न झाले. त्यागी वृत्तीच्या या योगी पुरु षाने पहिल्यांदाच स्वत:साठी काही तरी मागितले; पण ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याने मदत न घेताच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याची भावना श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.