शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

...आणि मदत स्वीकारण्यापूर्वीच डॉ. भीमराव गस्तींनी घेतला निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:33 IST

समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले.

 बदलापूर : समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले. पण त्यावर काही निर्णय घेऊन मदत पोचेपर्यंत सर्वांना ऋणात ठेवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या मित्रपरिवाराला कायमची चुटपूट लावून ते गेले!भीमरावांचे हे पत्र त्यांचे अखेरचे पत्र ठरले. त्यांनी ३१ जुलैला बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेचे कार्यवाह आणि त्यांचे स्नेही श्रीकांत देशपांडे यांना लिहिलेले पत्र बदलापूरच्या स्नेह्यांना ४ आॅगस्टला मिळाले. त्यांना कशापद्धतीने ठोस मदत करता येईल, यावर विचार करून निर्णय घेण्याच्या आत डॉ. भीमरावांनी जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त आल्याने बदलापुरातील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेत शोककळा पसरली.डॉ. गस्ती यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, मी जीवनभर लोकसेवाच केली. स्वत:साठी काही करू शकलो नाही. सध्या इकडे संस्थेत शिकणाºया देवदासी मुलींची संख्याही वाढली आहे. परिणामी संस्थेचा खर्चही वाढला, व्याप वाढला, प्रवासही वाढला. त्यामुळे माझ्या आरोग्याकडे माझेच पूर्ण दुर्लक्ष झाले. सध्या मी आजारी असून हैदराबाद येथील रु ग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत. हे उपचार खर्चिक होत असून त्याचा सारा भार कार्यकर्त्यांच्या अंगावर पडतो आहे. त्यामुळे मला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. जे जवळचे व आत्मीय मित्र आहेत त्यांनाच सांगतो आहे. या मदतीमुळे मी बरा होईन. अजून तसे खूप काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी पत्रात आपल्या बँकेचा खाते क्रमांकही दिला आहे.अंबरनाथच्या एज्युकेशन सोसायटीने संस्थापक भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरु केलेला पहिला दधिची पुरस्कार १९९८ मध्ये डॉ. भीमराव गस्ती यांना देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेनेही सुरु केलेला पहिला योगी अरविंद पुरस्कार २०११ मध्ये डॉ. गस्ती यांना देण्यात आला होता.संस्थांशी ऋणानुबंध असल्याने त्यांचे पत्र मिळताच मदतीबाबत मित्रांशी चर्चाही झाली. आठवडाभरात आम्ही हैदराबादला प्रत्यक्ष जाणारही होतो. मात्र सकाळीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे कळल्याने मन सुन्न झाले. त्यागी वृत्तीच्या या योगी पुरु षाने पहिल्यांदाच स्वत:साठी काही तरी मागितले; पण ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याने मदत न घेताच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याची भावना श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.