शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

...आणि मदत स्वीकारण्यापूर्वीच डॉ. भीमराव गस्तींनी घेतला निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:33 IST

समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले.

 बदलापूर : समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले. पण त्यावर काही निर्णय घेऊन मदत पोचेपर्यंत सर्वांना ऋणात ठेवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या मित्रपरिवाराला कायमची चुटपूट लावून ते गेले!भीमरावांचे हे पत्र त्यांचे अखेरचे पत्र ठरले. त्यांनी ३१ जुलैला बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेचे कार्यवाह आणि त्यांचे स्नेही श्रीकांत देशपांडे यांना लिहिलेले पत्र बदलापूरच्या स्नेह्यांना ४ आॅगस्टला मिळाले. त्यांना कशापद्धतीने ठोस मदत करता येईल, यावर विचार करून निर्णय घेण्याच्या आत डॉ. भीमरावांनी जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त आल्याने बदलापुरातील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेत शोककळा पसरली.डॉ. गस्ती यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, मी जीवनभर लोकसेवाच केली. स्वत:साठी काही करू शकलो नाही. सध्या इकडे संस्थेत शिकणाºया देवदासी मुलींची संख्याही वाढली आहे. परिणामी संस्थेचा खर्चही वाढला, व्याप वाढला, प्रवासही वाढला. त्यामुळे माझ्या आरोग्याकडे माझेच पूर्ण दुर्लक्ष झाले. सध्या मी आजारी असून हैदराबाद येथील रु ग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत. हे उपचार खर्चिक होत असून त्याचा सारा भार कार्यकर्त्यांच्या अंगावर पडतो आहे. त्यामुळे मला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. जे जवळचे व आत्मीय मित्र आहेत त्यांनाच सांगतो आहे. या मदतीमुळे मी बरा होईन. अजून तसे खूप काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी पत्रात आपल्या बँकेचा खाते क्रमांकही दिला आहे.अंबरनाथच्या एज्युकेशन सोसायटीने संस्थापक भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरु केलेला पहिला दधिची पुरस्कार १९९८ मध्ये डॉ. भीमराव गस्ती यांना देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेनेही सुरु केलेला पहिला योगी अरविंद पुरस्कार २०११ मध्ये डॉ. गस्ती यांना देण्यात आला होता.संस्थांशी ऋणानुबंध असल्याने त्यांचे पत्र मिळताच मदतीबाबत मित्रांशी चर्चाही झाली. आठवडाभरात आम्ही हैदराबादला प्रत्यक्ष जाणारही होतो. मात्र सकाळीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे कळल्याने मन सुन्न झाले. त्यागी वृत्तीच्या या योगी पुरु षाने पहिल्यांदाच स्वत:साठी काही तरी मागितले; पण ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याने मदत न घेताच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याची भावना श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.