शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

चिखलगावातील प्राचीन शिल्पे नष्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2015 03:55 IST

शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या चिखलगावमध्ये असणारी प्राचीन दगडी शिल्पे स्थानिक ग्रामस्थ

धसई : शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या चिखलगावमध्ये असणारी प्राचीन दगडी शिल्पे स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शिल्पांचे पुरातत्त्व खात्याकडून संशोधन करावे, अशी मागणी काही ग्रामस्थांकडून केली जात आहे. सुमारे ३५० लोकवस्ती असणाऱ्या चिखलगाव या महसूली गावापासून एक किलोमीटरवर जंगलात पांडवकालीन भवानीदेवीची मूर्ती व २०-२५ दगडी शिल्पे दोन किमीच्या परिघात पसरलेली आहेत. देवीच्या मूर्तीची ऊन-पावसात हेळसांड होऊ नये म्हणून चिखलगावकरांनी गेल्या वर्षीच जंगलात मूर्तीच्या ठिकाणी मंदिर उभारले आहे. मात्र, इतस्तत: पसरलेली ही दगडी शिल्पे अनेक वर्षांपासून ऊन -वारा-पाऊस यांच्या माऱ्याने झिजत आहेत. उभट आयताकृती दगडांवर घोड्यावर बसलेले शस्त्रधारी सैनिक, सिंहासनावर बसलेला राजा व सेवक, संभाषण करणारे स्त्री-पुरु ष, एकामागे एक जाणारे घोडेस्वार अशी चित्रे कोरलेली असून बरीच चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत. ही शिल्पे केव्हा कोरली गेली असावीत, याची माहिती माझ्या आजोबांनासुद्धा नव्हती, इतकी ती जुनी आहेत, अशी माहिती या गावातील ७५ वर्षे वय असलेले ज्येष्ठ नागरिक केशव बाबू देसले यांनी दिली. मीनल चव्हाण माध्यमिक विद्यालय, चिखलगावचे मुख्याध्यापक कैलास धनाजी देसले यांनी या शिल्पांचे संशोधन व जतन व्हावे, याकरिता प्रयत्न सुरू केले असून पुरातत्त्व विभाग व ऐतिहासिक वस्तू व वास्तूंच्या संशोधनकार्यात रस असणाऱ्या तज्ज्ञांनी येथे भेट देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत, शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना विचारले असता हे काम पुरातत्त्व विभागाने करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. हे कोरीवकाम व भवानीची मूर्ती पांडवकालीन असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाने पावले न उचलल्यास ही दुर्मीळ शिल्पे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.