शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आनंद आश्रम झाले शिवसेनेचे मुख्य केंद्र

By अजित मांडके | Updated: February 27, 2023 11:21 IST

टेंभी नाक्यावरील आनंद मठ आताचे आनंद आश्रम ऐतिहासिक वास्तू म्हणावी लागणार आहे. पूर्वी पारशी लोकांची ही जागा होती.

- अजित मांडके, प्रतिनिधीम्हाला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणा, असे पहिले पत्र ठाण्यातील आनंद आश्रम येथून निघाले आणि शिवसेनेचे नव शिवसेना भवन हे आता ठाण्यात असेल, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आनंद आश्रमाचे राजकीय महत्त्व आणखी वाढणार आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी अनेक चळवळी, आंदोलने, शिवसेना मोठे करण्याचे काम केले. कधीही निवडणुकीची रणनीती या केंद्रातून आखली नाही. त्यासाठी सूर्या हे कार्यालय निश्चित केले होते. आता नव्या शिवसेनेचे मुख्य केंद्र हे आनंद आश्रम झाल्याने येथून निवडणुकीचे राजकारण चालणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी वेगळ्या जागेची निवड करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टेंभी नाक्यावरील आनंद मठ आताचे आनंद आश्रम ऐतिहासिक वास्तू म्हणावी लागणार आहे. पूर्वी पारशी लोकांची ही जागा होती. १९६८च्या सुमारास दिवंगत आनंद दिघे यांनी ही जागा भाड्याने घेतली. त्यासाठी १५० रुपयांच्या आसपास भाडे आकारले जात होते. तेव्हापासून याची ओळख आनंद मठ अशी झाली. येथून दिघे यांनी शिवसेना वाढीबरोबरच अनेक आंदोलने, चळवळी उभारल्या. हजारोंच्या संख्येने तरुणांना नोकरीचे अर्ज दिले गेले. अनेक बहिणी तासन् तास रांगेत उभे राहून दिघे यांना राखी बांधत होत्या. या आनंद मठातील एका छाेट्या खाेलीत त्यांचे वास्तव्य होते. दिघे यांच्या निधनानंतर त्यांची खुर्ची तेथे असून, शिवसैनिक येथे नतमस्तक हाेतात.आनंद मठाची वास्तू जुनी झाली हाेती. ती पाडून नवीन वास्तू बांधली. तिला वाड्याचे स्वरूप देण्यात आले असून, ‘आनंद आश्रम’ असे नामकरण झाले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर या आनंद आश्रमाचे महत्त्व वाढले. शहरातील शाखा, आनंद आश्रम ताब्यात घेण्यावरून वादही रंगले. राजकीय घडामाेडींचे हे केंद्रबिंदू ठरले. शिंदे मुख्यमंत्री हाेताच, आनंद आश्रमातूनच शिवसेनेचा कारभार चालणार हे निश्चित झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम असे त्याचे नामकरण केले.

निवडणुकीचे कार्यालय कोणते?शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले व त्याच्या काही क्षणांनंतर याच आनंद आश्रमातून पहिले पत्र धाडले गेले, तेव्हाच आनंद आश्रमातून शिवसेनेचा कारभार चालणार हे निश्चित.

या आनंद आश्रमात वेगळी ऊर्जा असल्याने, दिघे यांनी या ठिकाणाहून निवडणुकीची कामे केव्हाही केलेली नसल्याचे जाणकर सांगतात. त्यासाठी ते सूर्या या कार्यालयावर मुक्कामी असत. सूर्या या कार्यालयातून निवडणुका लागल्यापासून फॉर्म वाटप ते अगदी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत दिघे यांचा मुक्काम असायचा. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणासाठी आनंद आश्रमाची निवड करणार की, सूर्या कार्यालयाकडे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे