शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दोन वर्षांच्या खंडानंतर भरणार वनवासी बांधवांच्या कला वस्तूंचे प्रदर्शन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 13, 2022 15:25 IST

वनवासी कल्याण आश्रम आयोजित प्रदर्शनाचे रौप्य महोत्सव, मोहाच्या फुलांपासून बनविलेले मणूके, चिकूपासून तयार केलेली विविध उत्पादने, बांबू, मातीच्या सजावटीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

प्रज्ञा म्हात्रेठाणे : कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा वनवासी बांधवांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठाण्यात पुन्हा एकदा भरणार आहे. यात बांबू, मातीपासून बनविलेल्या वस्तूंपासून वारली पेंटींग आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूही ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. वनवासी कल्याण आश्रम आयोजित प्रदर्शनाचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे अशी माहिती वनवासी कल्याण आश्रम, ठाणे महानगरच्या सचिव स्वाती जोशी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

वनवासी कल्याण आश्रम, ठाणे महानगर गेली २५ वर्षे वनवासी बांधवांनी तयार केलेल्या विविध कला वस्तूंचे प्रदर्शन भरवत आहे. १५, १६ आणि १७ ऑक्टोबर या कालावधीत ब्राह्मण सेवा संघा, ब्राह्मण सोसायटी, ठाणे (प.) येथे सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत तीन दिवसीय प्रदर्शन असणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रदर्शनाबरोबर विशेष स्मरणिकेचे अनावरण केले जाणार आहे. मुरबाड, शहापूर, वारडा , जव्हार, मोखाडा यांसारख्या महाराष्ट्रातील वनवासी भागांतील बांधव ठाण्यात त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू घेऊन दाखल होणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि स्टॉल्सची व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने बवनासी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असतो. यातून मिळणारा नफा हा पुर्णपणे त्या बांधवांना दिला जातो असेही जोशी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला संस्थेच्या नीलाक्षी करोडे, अनिल कोल्हटकर, उल्हास कार्ले, शीला वागळे आदी उपस्थित होत्या. यंदाच्या प्रदर्शनाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने घोडबंदर रोड, ब्रह्मांड, कोलशेत या तीन ठिकाणी एक दिवसीय तीन प्रदर्शने भरविण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. या प्रदर्शनात ३० स्टॉल्स असमार आहेत. मोहाच्या फुलांपासून बनविलेले मणूके, चिकूपासून तयार केलेली विविध उत्पादने, बांबू, मातीच्या सजावटीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. शहरातील नागरिकांना या वस्तू बाराही महिने उपलब्ध व्हाव्या म्हणून कायमस्वरुपी कला केंद्र तयार करण्याचा मानस संस्थेने पत्रकार परिषदेत व्यक्त केला.