शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अमृता प्रीतम जीवनपट कार्यक्रम संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:47 IST

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अमृता प्रीतम जीवनपट कार्यक्रम संपन्न झाला. 

ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर अमृता प्रीतम जीवनपट कार्यक्रम संपन्न  श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी केले अष्टपैलु गुणांचे सादरीकरणसाहित्यिका अमृता प्रीतम यांच्या जन्म शताब्दी निमित्त कार्यक्रम

ठाणे : अमृता प्रीतम यांचे साहित्य कथा कांदबरी कविता असं अष्टपैलु गुणांचे सादरीकरण श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी लीलया केले. आपण नेहमी इश्वरा जवळ मागत असतो. पण अमृता प्रीतम यांनी तर इश्वराला काही तरी करायला सांगितले. अमिता चक्रदेव यांनी सादर केलेल्या साई तु अपने चिल्म से थोडी आग दे दे या कवितेतून ते दिसून आले.  ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे येथे बिल्वा प्रस्तुत सहस्तकातली साहित्यिका अमृता प्रीतम यांच्या जन्म शताब्दी निमित्त एक आगळा वेगळा साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         सदर कार्यक्रमाची संहिता आणि सादरीकरण श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी सादर केला. अमृता प्रीतम यांचा जन्म दिनांक 31 ऑगस्ट 1919 रोजी पाकिस्तान मधील गुजरावाला येथे झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचे बालपण गेले.  फाळणीपूर्वी व फाळणी नंतरच्या बदलांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.  स्वतंत्र मनोवृत्तिच्या,  निर्भय, संवेदनशील मनाच्या अमृता प्रीतम यांच्या लेखणीतून त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडते. अगदी लहान वयात त्यांच्या आईचे मृत्यु दर्शन झाले.  त्यांच्या त्या कोवळ्या वयात लिहलेल्या 'मजबूर' या कवितेचे सादरी करण अमिता चक्रदेव यांनी सादर केले. स्रीला नेहमीच समाजात दुय्यम स्थान मिळते. याचे विदारक वर्णन अमृता प्रीतम यांच्या 'चिठ्ठी' या कवितेत दिसून येते त्याचे सादरीकरण श्रध्दा वझे यांनी अत्यंत भावपूर्ण शैलीत करुन रसिकांच्या मनात ठाव घेतला. अमृता प्रीतम यांनी समाजाच विदारक चित्र त्यांच्या कवितेतून थोर कवी वारिस शाह यांना आवाहन केले आहे. अमृता प्रीतम यांच्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कारांने गौरविले गेले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद तब्बल 36 भाषेत झाले आहे. त्यांना कविता सादर करण्यासाठी वेगवेगळ्या देशातून आमंत्रित केले गेले. अत्यंत मनाला भावणारे सत्य परिस्थितीचे भान असणारे काळजाला भिडणारे त्यांचे साहित्य अमित चक्रदेव व श्रध्दा वझे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. स्रीच्या हळव्या मनाचे सादरीकरण श्रद्धा वझे यांनी अमृता प्रीतम यांच्या 'मायका' या कवितेतून केले. त्यांच्या जीवनात आलेल्या प्रेमळ माणसांचे वर्णन त्यांच्या कवितेतून दिसून येते.  त्यांचे साहित्य प्रेमाचा अविष्कार तर प्रतिभा आणि प्रतिमा यांचे मिलन होते. त्यांचे प्रेम 'बेपनाह मुहब्बत व सिगरेट' या कवितेतून दिसून येते त्याचे सुंदर सादरीकरण श्रध्दा वझे यानी केले. आयुष्याच्या अखेरीस थोर चित्रकार इमरोज यांच्या बरोबर आयुष्य वथीत करताना त्यांचा कवितेत त्यांची स्वतंत्र मनोवृति दिसून येते.  त्या लिहतात "में तेरी समाज और तू मेरा समाज और कोई समाज नही". अमृता प्रीतम यांचे लिहणे म्हणजेच त्यांच जगनं होत. अशा या थोर साहित्यिकेच्या साहित्याची उकल श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी केली व रसिकांनी त्यांना भरभरुन दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा परिचय महेश जोशी, स्वागत प्रगती जाधव तर आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई