शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अमृता प्रीतम जीवनपट कार्यक्रम संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:47 IST

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अमृता प्रीतम जीवनपट कार्यक्रम संपन्न झाला. 

ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर अमृता प्रीतम जीवनपट कार्यक्रम संपन्न  श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी केले अष्टपैलु गुणांचे सादरीकरणसाहित्यिका अमृता प्रीतम यांच्या जन्म शताब्दी निमित्त कार्यक्रम

ठाणे : अमृता प्रीतम यांचे साहित्य कथा कांदबरी कविता असं अष्टपैलु गुणांचे सादरीकरण श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी लीलया केले. आपण नेहमी इश्वरा जवळ मागत असतो. पण अमृता प्रीतम यांनी तर इश्वराला काही तरी करायला सांगितले. अमिता चक्रदेव यांनी सादर केलेल्या साई तु अपने चिल्म से थोडी आग दे दे या कवितेतून ते दिसून आले.  ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे येथे बिल्वा प्रस्तुत सहस्तकातली साहित्यिका अमृता प्रीतम यांच्या जन्म शताब्दी निमित्त एक आगळा वेगळा साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         सदर कार्यक्रमाची संहिता आणि सादरीकरण श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी सादर केला. अमृता प्रीतम यांचा जन्म दिनांक 31 ऑगस्ट 1919 रोजी पाकिस्तान मधील गुजरावाला येथे झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचे बालपण गेले.  फाळणीपूर्वी व फाळणी नंतरच्या बदलांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.  स्वतंत्र मनोवृत्तिच्या,  निर्भय, संवेदनशील मनाच्या अमृता प्रीतम यांच्या लेखणीतून त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडते. अगदी लहान वयात त्यांच्या आईचे मृत्यु दर्शन झाले.  त्यांच्या त्या कोवळ्या वयात लिहलेल्या 'मजबूर' या कवितेचे सादरी करण अमिता चक्रदेव यांनी सादर केले. स्रीला नेहमीच समाजात दुय्यम स्थान मिळते. याचे विदारक वर्णन अमृता प्रीतम यांच्या 'चिठ्ठी' या कवितेत दिसून येते त्याचे सादरीकरण श्रध्दा वझे यांनी अत्यंत भावपूर्ण शैलीत करुन रसिकांच्या मनात ठाव घेतला. अमृता प्रीतम यांनी समाजाच विदारक चित्र त्यांच्या कवितेतून थोर कवी वारिस शाह यांना आवाहन केले आहे. अमृता प्रीतम यांच्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कारांने गौरविले गेले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद तब्बल 36 भाषेत झाले आहे. त्यांना कविता सादर करण्यासाठी वेगवेगळ्या देशातून आमंत्रित केले गेले. अत्यंत मनाला भावणारे सत्य परिस्थितीचे भान असणारे काळजाला भिडणारे त्यांचे साहित्य अमित चक्रदेव व श्रध्दा वझे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. स्रीच्या हळव्या मनाचे सादरीकरण श्रद्धा वझे यांनी अमृता प्रीतम यांच्या 'मायका' या कवितेतून केले. त्यांच्या जीवनात आलेल्या प्रेमळ माणसांचे वर्णन त्यांच्या कवितेतून दिसून येते.  त्यांचे साहित्य प्रेमाचा अविष्कार तर प्रतिभा आणि प्रतिमा यांचे मिलन होते. त्यांचे प्रेम 'बेपनाह मुहब्बत व सिगरेट' या कवितेतून दिसून येते त्याचे सुंदर सादरीकरण श्रध्दा वझे यानी केले. आयुष्याच्या अखेरीस थोर चित्रकार इमरोज यांच्या बरोबर आयुष्य वथीत करताना त्यांचा कवितेत त्यांची स्वतंत्र मनोवृति दिसून येते.  त्या लिहतात "में तेरी समाज और तू मेरा समाज और कोई समाज नही". अमृता प्रीतम यांचे लिहणे म्हणजेच त्यांच जगनं होत. अशा या थोर साहित्यिकेच्या साहित्याची उकल श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी केली व रसिकांनी त्यांना भरभरुन दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा परिचय महेश जोशी, स्वागत प्रगती जाधव तर आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई