शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केडीएमसीत आक्षेपाधीन रक्कम चार अब्जांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:03 IST

लेखा परीक्षण अहवाल : स्थापनेपासून आजपर्यंत नोंदवले सात हजार आक्षेप

- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १९८३ मध्ये झालेल्या स्थापनेपासून आता ३१ मार्च २०१९ पर्यंत लेखा परीक्षण अहवालात विविध खात्यांमधील अनियमिततेविषयी सात हजार ६०४ आक्षेप नोेंदविले गेले आहेत. ते दूर न केल्यामुळे आक्षेपाधीन रक्कम चार अब्ज पाच कोटी ८० लाख ६८ हजार इतकी मोठी आहे. मुख्य लेखा परीक्षकांनीच हा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

महापालिकेचा लेखा परीक्षण अहवाल तीन वर्षांपूर्वी दिरंगाईने स्थायी समितीसमोर मांडला गेला होता. तत्कालीन लेखा परीक्षक दिग्विजय चव्हाण यांनी स्थायी समितीसमोर अहवाल येईल, म्हणून सुटीवर जाणे पसंत केले होते. त्यानंतर हा अहवाल चर्चेसाठी स्थायी समितीसमोर येण्यापूर्वीच त्यांनी स्वत:ची बदली करून घेणे उचित समजले. त्यानंतर त्यांच्याजागी मुख्य लेखा परीक्षक म्हणून दिनेश थोरात यांची नियुक्ती सरकारने केली. थोरात यांनी तीन वर्षांत लेखा परीक्षणातील सगळा गाळ उपसला आहे. महापालिकेचे जेथे आर्थिक नुकसान झाले, तसेच जेथे आर्थिक अनियमितता आहे, त्यावर त्यांनी बोट ठेवले आहे. लेखा परीक्षणाचे वस्तूनिष्ठ अहवाल त्यांनी स्थायी समितीसमोर सादर केले आहेत.

माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या तपशीलात महापालिकेने त्यांना वरील माहिती दिली आहे. महापालिकेने आक्षेप दूर न केल्यामुळे त्याची रक्कम अब्जावधीच्या घरात आहे. तर, वसूल पात्र रक्कम पाच कोटी ३२ लाख ४५ हजार रुपये इतकी असून, तीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून महापालिका प्रशासनाने वसूल केलेली नाही. ही रक्कम वसूल केल्यास महापालिकेस आर्थिक दिलासा मिळू शकतो, याकडे गोखले यांनी लक्ष वेधले आहे. आर्थिक अनियमिततेचे आक्षेप दूर करण्यात प्रशासनाला स्वारस्य नाही. वसूलपात्र रक्कमही संबंधित खातेप्रमुखांकडून वसूल केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने आर्थिक अनियमितता करणाऱ्यांना रान मोकळे सोडल्याचा आरोप गोखले यांनी केला आहे.

दरम्यान, थोरात यांनी लेखा परीक्षणाचा अहवाल नुकताच महापालिका सचिव आणि स्थायी समिती सभापतींनाही सादर केला आहे. हा अहवाल समितीच्या पटलावर आणून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव मंजूर करणे अपेक्षित आहे. लेखा परीक्षणातील आक्षेप दूर करणे व वसूल पात्र रक्कम वसूल करणे, याची कार्यवाही आयुक्तांमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. समितीने ठराव करून त्याची अंमलबजावणी केल्यास महापालिकेच्या तिजोरीत पाच कोटी ३२ लाख ४५ हजार रुपये जमा होतील, असे गोखले पुढे म्हणाले.अन्य विभागातील संख्याही शेकडोंच्या वरबांधकाम, नगररचना, शिक्षण मंडळ, मार्केट, माध्यमिक शाळा, विधी विभाग, जलनिस्सारण, शहर अभियंता, परवाना विभाग, संगणक विभाग, स्थानिक संस्था कर, अभिलेख, घनकचरा विभाग, शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालय या विभागांसह १० प्रभाग क्षेत्र कार्यालयातील आक्षेपांची संख्याही शेकडोंच्या वरती आहे.जकातीच्या आक्षेपानुसार वसूल पात्र रक्कम एक कोटीजकात वसुली बंद केली असली तरी जकात संदर्भातील आक्षेपानुसार वसूल पात्र रक्कम ही एक कोटी आहे. पाणी खात्यातून वसूलपात्र रक्कम ही एक कोटी ११ लाख रुपये आहे. जकातीनंतर एलबीटी वसुली सुरू झाली. त्यातही दोन लाख ५७ हजार रुपये वसूलपात्र म्हटले आहे. तसेच अन्य विभागांचे वसुलीपात्र रक्कमेचे आकडे हे लाखो रुपयांमध्ये आहेत.कोणत्या खात्याचेआक्षेप किती?जकात वसुली १,२१८लेखा खाते १,०३८पाणी खाते ७७१उपायुक्त सामान्य प्रशासन ६५३करआकारणी ४३८मालमत्ता २८४आरोग्य २४७उपायुक्त डोंबिवली २०८वाहन खाते १४५भांडार १४०विद्युत १२०