शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजपच्या इच्छुकांमध्ये ओमी पप्पू कलानीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:29 IST

उल्हासनगर विधानसभा : आयलानी, इदनानी यांनीही दिल्या मुलाखती

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : उल्हासनगर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रदेश सचिव विक्रांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी, वादग्रस्त पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्यासह आठ जणांनी मुलाखती दिल्याने उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

पक्षातील व्यक्तीस उमेदवारी देण्याचे ठरवले, तर मुख्य दावेदार कुमार आयलानी हे असून त्यांच्यासह पक्षाचे महापालिकेतील गटनेते जमनुदास पुरस्वानी, माजी शहराध्यक्ष महेश सुखरामाणी, ओमी कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड व कांचन लुंड यांनी मुलाखती दिल्या आहेत.

भाजपकडून कुमार आयलानी यांचे नाव आघाडीवर असले, तरी महापालिकेच्या सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी, साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही मुलाखती दिल्याने शहरातील सत्तेची समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. आयलानी यांच्या उमेदवारीला पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीच्या आ. ज्योती कलानी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असून त्यांनी सप्टेंबर महिन्यात पक्षप्रवेश केल्यास त्या स्वत: किंवा ओमी हेच भाजपच्या विधानसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार राहणार आहेत. महापालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी अर्धेअधिक कलानी समर्थक आहेत. पालिका सत्तेत महत्त्वाची भूमिका वठवणारे साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही उमेदवारीकरिता प्रयत्न केल्याने उल्हासनगरात प्रथमच चुरस पाहायला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती कायम राहिल्यास कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपमधील काहींचे म्हणणे आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप ओमी कलानी यांना रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे.आयलानी-कलानी सामना रंगणारभाजप-शिवसेनेकडून कलानी कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली गेली, तर शहर भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आणि जर कलानी कुटुंबाला भाजपने डावलल्यास कलानी कुटुंब राष्ट्रवादी किंवा वंचित आघाडीच्या वतीनेही निवडणूक लढवेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.पालिका निवडणुकीच्यावेळी भाजपने ओमी कलानी टीमला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. त्यानंतर महापौरपदासाठीही भाजपने ओमी टीमला फार रडकुंडाला आणले होते. अगदी हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागले होते.