शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अंबरनाथच्या नाल्याने रेल्वे प्रशासनाचा केला घात! रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प

By पंकज पाटील | Updated: July 19, 2023 14:18 IST

नाल्याच्या प्रवाहात खडीदेखील गेली वाहून.

अंबरनाथ: गेल्या 24 तासात झालेला मुसळधार पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच अंबरनाथ पूर्व भागातील मुख्य नाला धोकादायक स्थितीत असल्याने या नाल्याने रेल्वे रुळाला देखील आपल्या मगर मिठीत घेतले आहे. या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्यावर असलेल्या रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून गेली आहे. हा रेल्वे मार्ग धोकादायक झाल्याने या ठिकाणची अप आणि डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अंबरनाथ शहरातील सर्वच नाले भरून वाहू लागल्याने या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रेल्वे रुळावर आला होता.  या पाण्याच्या प्रवाहात रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आले होते. सुरुवातीला अर्धा तास रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. मात्र त्यानंतर बदलापूर होऊन मुंबईच्या दिशेने एक लोकल सोडण्यात आली. ही लोकल गेल्यानंतर पुन्हा एकही लोकल अप किंवा डाऊन दिशेने सोडण्यात आली नाही.

अंबरनाथच्या बी केबिन परिसरातील मुख्य नाल्याने रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून नेल्याने हा रेल्वे मार्ग धोकादायक झाला होता. सकाळी 11 पासून दुपारी दोन वाजेपर्यंत एकही लोकल अथवा एक्सप्रेस गाडी सोडण्यात आली नाही. पावसाचा पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट अधिकारी बघत होते. रेल्वे रुळाखालील वाहून गेलेली खडी पूर्ववत करण्यासाठी 30 ते 40 कर्मचारी देखील बोलावण्यात आले होते.

मात्र पावसाचा प्रवाह कमी होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना देखील पावसाच्या विश्रांतीची वाट पहावी लागली. रेल्वे रुळाखालील संपूर्ण खडी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने अधिकाऱ्यांनी देखील या रेल्वे रुळाखालील पाण्याची पातळी तपासून युद्ध पातळीवर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या तीन तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा प्रकार अंबरनाथच्या मोरीवली गाव परिसरात देखील घडला असून त्या ठिकाणी देखील नाले भरून वाहत असल्यामुळे संपूर्ण पाणी रेल्वे रुळावर आले होते. बदलापुरातील प्रवाशांना मुंबई दिशेकडे एकही लोकल सोडण्यात आली नाही.