शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

अंबरनाथच्या नाल्याने रेल्वे प्रशासनाचा केला घात! रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प

By पंकज पाटील | Updated: July 19, 2023 14:18 IST

नाल्याच्या प्रवाहात खडीदेखील गेली वाहून.

अंबरनाथ: गेल्या 24 तासात झालेला मुसळधार पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच अंबरनाथ पूर्व भागातील मुख्य नाला धोकादायक स्थितीत असल्याने या नाल्याने रेल्वे रुळाला देखील आपल्या मगर मिठीत घेतले आहे. या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्यावर असलेल्या रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून गेली आहे. हा रेल्वे मार्ग धोकादायक झाल्याने या ठिकाणची अप आणि डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अंबरनाथ शहरातील सर्वच नाले भरून वाहू लागल्याने या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रेल्वे रुळावर आला होता.  या पाण्याच्या प्रवाहात रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आले होते. सुरुवातीला अर्धा तास रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. मात्र त्यानंतर बदलापूर होऊन मुंबईच्या दिशेने एक लोकल सोडण्यात आली. ही लोकल गेल्यानंतर पुन्हा एकही लोकल अप किंवा डाऊन दिशेने सोडण्यात आली नाही.

अंबरनाथच्या बी केबिन परिसरातील मुख्य नाल्याने रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून नेल्याने हा रेल्वे मार्ग धोकादायक झाला होता. सकाळी 11 पासून दुपारी दोन वाजेपर्यंत एकही लोकल अथवा एक्सप्रेस गाडी सोडण्यात आली नाही. पावसाचा पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट अधिकारी बघत होते. रेल्वे रुळाखालील वाहून गेलेली खडी पूर्ववत करण्यासाठी 30 ते 40 कर्मचारी देखील बोलावण्यात आले होते.

मात्र पावसाचा प्रवाह कमी होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना देखील पावसाच्या विश्रांतीची वाट पहावी लागली. रेल्वे रुळाखालील संपूर्ण खडी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने अधिकाऱ्यांनी देखील या रेल्वे रुळाखालील पाण्याची पातळी तपासून युद्ध पातळीवर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या तीन तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा प्रकार अंबरनाथच्या मोरीवली गाव परिसरात देखील घडला असून त्या ठिकाणी देखील नाले भरून वाहत असल्यामुळे संपूर्ण पाणी रेल्वे रुळावर आले होते. बदलापुरातील प्रवाशांना मुंबई दिशेकडे एकही लोकल सोडण्यात आली नाही.