शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

वाहतूककोंडीने अंबरनाथकर झाले पुरते हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:01 IST

वाहतूक विभागाचे दुर्लक्ष; शाळेच्या पहिल्याच दिवशी उशिरा जाण्याची आली वेळ

अंबरनाथ: १७ जून पासून सर्वच शाळा सुरू झाला. शाळा भरण्याच्या दिवशी शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पश्चिम भागात सात ते आठ मोठ्या शाळा आहेत त्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच सर्वाधिक वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे शाळेच्या बस वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. ही सर्व वाहतूककोंडी केवळ पोलीस स्टेशन चौकात होत असल्याने यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी होत आहे.अंबरनाथ शहरातील वाहतूक कोंडी सर्वांनाच त्रासदायक ठरते आहे. ही सर्व कोंडी एकाच रस्त्यावर होत असल्याने येथे वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचे दिसते. दुपारी १२ ते २ च्या दरम्यान ही कोंडी सर्वाधिक असल्याने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही तेथील कोंडी मात्र अजूनही फुटलेली नाही.कल्याण-बदलापूर रस्त्यावरील नगरपरिषद चौक, पोलीस स्टेशन चौक आणि विम्को नाका चौक सातत्याने कोंडीत सापडत आहे. शाळेची वेळ असो वा नसो, या ठिकाणी कोंडी मात्र कायम आहे. या कोंडीवर लक्ष केंद्रित करुन त्यावर उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र या रस्त्यावरील बेकायदेशीर वाहन पार्र्किं ग, दुकानदारांचे अतिक्रमण, पोलीस स्टेशन बाहेरील वाहने हे अडचणीचे मुद्दे ठरत आहेत. मात्र त्यावर कोणतेच उपाय आखले जात नाहीत. सोमवारी दुपारी १२ वाजता पुन्हा याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शाळा भरण्याची आणि सकाळच्या सत्रातील शाळा सुटण्याची वेळ असल्याने ही कोंडी सर्वाधिक झाली.अनेक शाळांचा आज पहिला दिवस असल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी उशीरा जाण्याची वेळ आली. या कोंडीत अडकलेल्या शाळेच्या बस बाहेर काढण्याकडेही योग्य लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शाळेला बसतो आहे. दुसरीकडे या रस्त्यावर कोंडी वाढत असल्याने आता पर्यायी रस्त्यांचा शोध घेत वाहन चालक मार्ग बदलण्याचे काम करताना दिसतात.

टॅग्स :ambernathअंबरनाथTrafficवाहतूक कोंडी